Comments

Technology/hot-posts
thumbnail

पीएम किसानचे 2 हजार रुपये अजून पर्यंत खात्यावर आले नसतील तर घाबरू जाऊ नका, वाचा सविस्तर माहिती..!

आतापर्यंत केंद्र सरकारद्वारे देशातील शेतकर्‍यांना यशस्वीरीत्या 12 हप्ते पाठविण्यात आले आहे. अलीकडेच ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारने (Central Government of India) शेतकर्‍यांच्या खात्यावर 12 वा हफ्ता पाठविला आहे. हे पैसे डीबीटीद्वारे पाठविण्यात येतात. मिळालेल्या माहितीनुसार 8 कोटी पेक्षा जास्त शेतकर्‍यांना 16 हजार कोटी हस्तांतरित केले आहे. पण महत्वाची माहिती अशी की अलीकडे पीएम किसानचे हफ्ते मिळण्याच्या संदर्भात बर्‍याच शेतकर्‍यांच्या तक्रारी ऐकायला येत आहे. (PM Kisan Scheme)..

अलीकडेच असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना पीएम किसान योजनेचा 12 वा हफ्ता मिळाला नाही. याला अनेक कारणे आहेत. त्यापैकी आधार क्रमांक बरोबर दिलेला नसणे, बँक अकाऊंट नंबर मध्ये देखील चूक असणे तसेच अजून पर्यंत E-kyc झालेली नसणे हे कारणे आहेत. त्यासाठी तुम्ही एक काम करू शकता.
तुमच्या मोबाइल वरून pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तिथे दिलेल्या माहितीची शहानिशा करू शकता. जर तुमच्याकडून ही प्रक्रिया मोबाइल वर करणे शक्य नसेल तर जवळील CSC सेंटरला भेट देऊन चौकशी करून घ्या. किंवा तुम्ही पीएम किसान योजनेशी संबधित संपर्क क्रमांक व ईमेल वर तक्रार देखील करू शकता.
या नंबर वर करा तक्रार
योजने संदर्भात तक्रार किंवा मदतीसाठी याठिकाणी ईमेल व संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे. येथे संपर्क करून तुम्ही आपली माहिती देऊ शकता. त्यासाठी एक टोल फ्री क्रमांक आहे – 1800115526, 011-23381092 तसेच ईमेल देखील करता येतो. योजने संदर्भात काहीही माहितीसाठी pmkisan-ict@gov.in या ईमेल वर वर ईमेल पाठविता येतो.
thumbnail

फक्त गट नंबर टाका व कोणत्याही जमिनीचा नकाशा मोफत मोबाईलवर पहा

शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत 

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

गट नंबर टाकून नकाशा डाऊनलोड करण्यासाठी
              👉👉येथे क्लिक करा 👈👈

जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या वेब साईट वर जायचं आहे.
या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे

त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो.
होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.
त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो म्हणजेच झूम इन किंवा झूम आऊट करता येतो.
पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे Mp Land Record.
आता जमिनीचा नकाशा कशा काढायचा ते पाहूया.
या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.
इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.
होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.
आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते Mp Land Record.
ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो.
यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा plot report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.
त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. जसं की इथं 337 या गटाशेजारी 329, 338, 340,341,346,336 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसतात.
आणि मग खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
thumbnail

अशीच मुलींसाठी एक लोकप्रिय सरकारी योजना आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना

पालक आपल्या मुलांच्या भविष्याबाबत फार सजग असतात. त्यामुळे त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मुलं लहान असल्यापासून ते अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. मुलं लहान असताना केलेली गुंतवणूक पुढे त्यांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी उपयोगी पडू शकते, असा पालकांचा विचार असतो.

अशीच मुलींसाठी एक लोकप्रिय सरकारी योजना आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. अनेक पालक आपल्या मुलीच्या लग्नासाठी बचत म्हणून या योजनेत गुंतवणूक करतात. या योजनेत गुंतवणूक करावी की नाही, असा प्रश्नही काही पालकांना पडतो, त्यामुळे या योजनेचे फायदे, व्याजदर आणि त्या संदर्भातील इतर गोष्टी जाणून घेऊयात.

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदेसुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, शिवाय गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे मोठी रक्कम असावी असंही नाही. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही वर्षाला किमान 250 रुपये आणि जास्तीतजास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत सूटही मिळते. त्यामुळे ही गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.
योजनेचा व्याज दर किती
सध्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.6 टक्के व्याजदेखील मिळतं. या योजनेत गुंतवणूक केल्यास काही वर्षांच्या कालावधीत तुमचे पैसे दुप्पट होतात. त्यामुळे पालक या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देतात.

मुदत संपल्यावर किती रक्कम मिळते.
सध्याच्या व्याजदरानुसार, जर प्रत्येक आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये असे 15 वर्षांसाठी जमा केले, तर तुमच्याद्वारे जमा केलेली एकूण रक्कम 22,50,000 रुपये असेल आणि त्यावरचे व्याज 41,36,543 रुपये असेल. तसंच 21 वर्षं पूर्ण झाल्यानंतर या गुंतवणुकीची मुदत पूर्ण होईल. अशा परिस्थितीत खात्यावर जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत राहील.
21 वर्षांपर्यंत ही रक्कम व्याजासह सुमारे 64 लाख रुपये होईल. एक नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी की सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याज केंद्र सरकार दर तिमाहीत ठरवते. त्यामुळे मुदत पूर्ण होईपर्यंत अनेक वेळा व्याजदर बदलू शकतात. अगदी वर्षाला दीड लाख रुपये गुंतवणं प्रत्येक पालकाला शक्य नसलं तरीही व्याजदर चांगला मिळत असल्याने ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. या योजनेत गुंतवलेले पैसे मध्ये काढता येत नाहीत.
सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्याची प्रोसेस

सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी मुलीच्या पालकांना जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जावं लागेल. येथे तुम्हाला अर्जाचा फॉर्म मिळेल. या अर्जामध्ये, तुम्हाला तुमची सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल. यानंतर, तुमची सर्व आवश्यक कागदपत्रं या फॉर्मसोबत जोडून पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत सबमिट करा. या सोप्या प्रक्रियेचं अनुसरण करून, तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खातं सहज उघडू शकता.
हे सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे आहेत. प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे कुटुंबाच्या इतर खर्चांमध्ये वेगळी अशी बचत करणं मध्यमवर्गीय पालकांना अवघड होतं. या योजनेत व्याज दर चांगला असल्याने थोडी रक्कम यात गुंतवली तरीही फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने योजनेबद्दल समजून घेऊन नंतरच मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक करायची की नाही, या संदर्भातला निर्णय घ्यावा.

thumbnail

UIDAI तुमचे आधार तुम्हीच करू शकता अपडेट लवकरात लवकर करा तुमच्या मोबाईलवर अपडेट नाहीतर होऊ शकते बंद

UIDAI : नमस्कार मित्रांनो पीआयबी(PIB) म्हणजे त्याला आपण प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो असे म्हणतो यांनी एक महत्त्वाची अशी नोटीस जाहीर केलेले आहे.या अंतर्गत नागरिकांना अशी माहिती देण्यात आलेली आहेत की जर तुम्ही तुमचे आधार कार्ड १० वर्षापासून अपडेट केले नसेल तर तुमचे आधार कार्ड बंद करण्यात येणार आहे.आणि या नोटीसमध्ये सांगितले आहे की ज्या ज्या नागरिकांनी हे आधार कार्ड अपडेट केलेली नाही.त्यांनी लवकरात लवकर आपल्या आधार कार्ड अपडेट करून घ्यावी नाहीतर आपले आधार कार्ड बंद होऊ शकते.तर आता आपण पाहू या आधार कार्ड कसे अपडेट करावे.

पीआयपी(PIB) ने काय नोटीस दिली UIDAI ?

गेल्या दहा (10) वर्षांमध्ये, आधार क्रमांक व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना UIDAI आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी, सामान्य लोकांना आधार डेटा नवीनतम वैयक्तिक तपशीलांसह अद्यतनित करणे आवश्यक आहे जेणेकरून आधार प्रमाणीकरण / पडताळणीमध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही.

ज्या व्यक्तींनी ’10’ वर्षांपूर्वी त्यांचे आधार बनवले आहेत आणि त्यानंतर या वर्षांत अपडेट केलेले नाहीत, अशा आधार क्रमांक धारकांना कागदपत्रे अपडेट करण्याची विनंती केली जाते. त्यानुसार, या संदर्भात, UIDAI ने आधार क्रमांक धारकांना विहित शुल्कासह दस्तऐवज अद्यतनाची सुविधा प्रदान केली आहे, ज्याद्वारे आधार क्रमांक धारक वैयक्तिक ओळखीचा पुरावा (POI) आणि पत्ता पुरावा (POA) दस्तऐवज अद्यतनित करू शकतात. आधार डेटा. आहे.

thumbnail

Indian post bharti : पोस्ट ऑफिस मध्ये नवीन भरती सुरू,पगार तब्बल 63000 रुपये, पात्रता फक्त आठवी पास.

Indian post bharti 2022 नमस्कार माझा विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी काही खास अशी बातमी घेऊन आलो आणि ही बातमी अशी ही पोस्ट ऑफिस मध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे आणि आपण कालच एक पोस्ट ऑफिस भरती विषयी जाहिरात टाकलेली होती पण ती मित्रांनो ड्रायव्हर या पदांसाठी होती आणि आता ही जी भरती नवीन निघालेली आहे वेगवेगळ्या काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो या भरतीसाठी तुम्हाला फक्त एक ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे आणि अर्ज करण्या अगोदर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला कोणत्या पोस्ट आहेत तसेच यासाठी पगार काय मिळणार आहे ही सर्व तुम्हाला माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून मिळणार आहे.
Indian Post Recruitment 2022
मित्रांनो ही भरतीची जाहिरात ही शंभर टक्के खरी असून यामध्ये आपण शासकीय भरतीची अधिकृत जाहिरातीची लिंक सुद्धा दिली आहे ती तुम्ही वरती द्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता मित्रांनो यामध्ये फक्त आठवी ते दहावी पास विद्यार्थी मित्रांसाठी भरती आहे तर मित्रांनो खाली पूर्ण पहा पूर्ण माहिती घ्या आणि मगच अर्ज करा खाली सर्व माहिती दिली आहे कोणती पदे रिक्त आहेत आणि सर्वात शेवटी अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिलेली आहे.
 
रिक्त पदे खालीलप्रमाणे आहेत
 एम.व्ही.मेकॅनिक
एम.व्ही. इलेक्ट्रिशियन
चित्रकार
वेल्डर
सुतार

या पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय आहे ?

 

वरील दिलेल्या सगळ्या पदांसाठी अर्ज तुम्हाला करायचा असेल तर यासाठी शैक्षणिक पात्रता जास्त नाहीये फक्त आठवी पास असला पाहिजे आणि तसंच आयटीआय पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे. आयटीआय कोणचा ग्रेड मधील करायचा त्यासाठी पूर्ण माहितीसाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या “Indian Post Recruitment 2022”

 

पदांसाठी इतका मिळणार पगार.

एम.व्ही.मेकॅनिक – 19,900 – 63,200 रुपये दर महा मिळेल
एम.व्ही. इलेक्ट्रिशियन – 19,900 – 63,200 रुपये दरमहा मिळेल.
चित्रकार – 19,900 – 63,200 रुपये दरमहा मिळेल.
वेल्डर – 19,900 – 63,200 रुपये दरमहा मिळेल.
सुतार – 19,900 – 63,200 रुपये दरमहा मिळेल
thumbnail

नियमित कर्जमाफी अनुदान बँक खात्यात जमा, नवीन GR आला पहा | नियमित कर्जमाफी 50000 अनुदान योजना 2022



Niyamit Karjmafi 50000 Anudan Yojana – सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती.

Niyamit Karjmafi 50000 Anudan Yojana

त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणेबाबत दिनांक 27.07.2022 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुसार सहकार विभागाच्या संदर्भ क्र. 1 दिनांक 20.07.2022 च्या शासन निर्णयान्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनायोजना 2010 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तसेच, सदर योजनेसाठी सहकार विभागाच्या संदर्भाधीन क्र.2 दि.02.08.2022 च्या शासन निर्णयान्वये नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्यात आले आहे.

शासन निर्णय

सन 2022 – 23 या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मजूर निधीपैकी रु. 2350.00 कोटी (रु. दोन हजार तिनशे पन्नास कोटी फक्त) इतकी रक्कम महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर)(कार्यक्रम) (2435 0189), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

thumbnail

आता एका ग्राहकाला वर्षात एवढेच गॅस सिलेंडर मिळणार | lpg gas cylinder update

lpg gas cylinder update

ग्राहकांना आता नव्या नियमानुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त 15 सिलिंडर मिळणार आहेत. तसेच कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही. तिन्ही तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

आतापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेवढे सिलिंडर मिळत होते. तथापि, नव्या नियमानुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात 15 सिलिंडरच मिळणार आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादिबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलिंडरसंदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच याची तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.

वर्षात एवढेच गॅस सिलेंडर

अनेकदा व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. यासंदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर येत असल्यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. अ

नुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी नोंदणी केलेल्यांना त्या दराने वर्षभरात केवळ 15 सिलिडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलिंडरची गरज भासल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलिडर घ्यावे लागेल. एखाद्या ग्राहकाला गॅसची जास्त किंमत मोजावी लागत असेल, तर त्याचा पुरावा देऊन त्याला तेल कंपनीच्या अधिका-यांची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतरच संबंधित ग्राहकाला अतिरिक्त रीफिल मिळू शकेल, असे सांगण्यात आले आहे.


thumbnail

शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार आर्थिक मदत


शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार आर्थिक मदत. ज्या शेतकऱ्यांची दुधाळ किंवा इतर जनावरे लम्पी आजाराने दगावली असतील आशा शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने 30 हजार ते 16 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.


शेतकऱ्यांना दिली जाणारी ही मदत राष्ट्रीय आप्पती निवारण धोरणामधील निकषानुसार दिली जाणार आहे.
केंद्राने प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 यानुसार लम्पी हा जनावरांना होणारा चर्म रोग अनुसूचित करण्यात आलेला आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यातील एकूण 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांना हा रोग झालेला आहे.
सगळ्यात अगोदर हा लम्पी चर्मरोग दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यामध्ये आढळून आला होता.

त्यानंतर महाराष्ट्रतील 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनास या रोगाची लागण झाली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनास लम्पी हा रोग झालेला आहे अशा शेतकऱ्यांना आता शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार रुपये आर्थिक मदत निकष खलीलप्रमाणे

ज्या शेतकऱ्यांना 30 हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे ते खलील पद्धतीने मिळणार आहेत.


1) ज्या शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे असतील आणि ही जनावरे या रोगाने प्रभावित झाली असतील तर अशा पशुपालकांना 30 हजार रुपये प्रती जनावर या प्रमाणे 90 हजार आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांकडील केवळ तीनच जनावरांना याचा लाभ मिळणार आहे.

2) जनावरांचा मृत्यू लम्पी रोगाने झाला असेल तरच ही मदत दिली जाणार आहे.

तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लम्पी आजाराने जनावरे दगावले तर आर्थिक मदत मिळणार आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

शेती पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे असतात. अशावेळी या जनावरांना लम्पी रोग झाला तर खूप मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावी लागते.

केवळ दुधाळ जनावरेच नव्हे तर शेतीसाठी लागणारे बैल देखील शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत.
दुधाळ जनावरांना लम्पी झाला तर दुधावर परिणाम होतो आणि बैलांना जर हा रोग झाला तर शेतीकामावर परिणाम होतो.


अशावेळी शेती मशागतीची कामे व दुग्धव्यवसाय प्रभावित झाल्याने खूप मोठे नुकसान होते.
यामुळे शासनाच्या वतीने दिली जाणारी ही मदत नक्कीच शेतकऱ्यांना सहाय्य ठरणार आहे.

कसे मिळणार 90 हजार आर्थिक मदत?

ज्या शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांना लम्पीरोग झाला आहे आणि त्यामुळे मृत्यू झाला आहे त्यांना एका जनावरांसाठी 30 हजार याप्रमाणे 3 जनावरांसाठी 90 हजार मदत मिळेल

मदतीचे निकष काय आहेत?

ही मदत फक्त लम्पी रोगाने मृत्यू झालेल्या जनावरांसाठी आहे

योजनेची अधिक माहिती कोठे मिळेल?

हा लेख पूर्ण वाचल्यास योजनेची पूर्ण माहिती मिळेल. यासंदर्भात शासन निर्णय देखील तुम्ही बघू शकता

thumbnail

पीएम किसान योजनेत महत्त्वाचे बदल, आता 'या' कागदपत्रांची करावे लागेल पूर्तता

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सरकारने पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार आता नोंदणीच्या (रजिस्ट्रेशन) दरम्यान राशन कार्डशी संबंधित सर्व माहिती देणे आवश्यक केले आहे. आता तुम्हाला नोंदणी करताना राशन कार्डही अपलोड करावे लागेल. अन्यथा तुम्हाला पुढील हप्त्याची रक्कम मिळणार नाही. (PM Kisan Samman Yojana New Changes In This Scheme, These Documents Compulsory)
या बरोबरच सरकारने योजनेचे लाभ सुरु राहण्यासाठी ई-केवायसी भरणेही अनिर्वाय केले आहे. वास्तविक सरकारने पीएम किसान सन्मान योजनेत होत असलेल्या फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी हे बदल केले आहेत. या योजनेत कुटुंबाचा एक सदस्य पती किंवा पत्नीच पैसे घेऊ शकतात. सरकारने स्पष्ट केले आहे, की ज्या शेतकऱ्यांजवळ राशन कार्ड आहे, त्यांनी पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in वर जाऊन आपली नोंदणी करु शकतात. या व्यतिरिक्त शेतीचा सातबारा, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचा क्रमांक असणे आवश्यक आहे. या बरोबरच संकेतस्थळावर राशन कार्ड क्रमांकासह मागितलेले कागदपत्रांची साॅफ्ट काॅपी अपलोड करणे ही आवश्यक आहे.
ई-केवायसी आहे आवश्यकशेतकऱ्यांना (Farmer) ई-केवायसी करण्यासाठी ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदत दिली गेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांना लाभ मिळालेला नाही. जर तुम्ही ई केवायसी केले नसेल तर लवकरात-लवकर ते करा.
thumbnail

Army Agnipath) भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022

(Army Agnipath) भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव1अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD)]2अग्निवीर (टेक्निकल) 3सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
4अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल5अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)6अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

हे पण पहा👇👇👇



शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा. 

पद क्र.3: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).

पद क्र.4: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).

पद क्र.5: 10वी उत्तीर्ण.

पद क्र.6: 08वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी 17.5 ते 23 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

सूचना: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.
thumbnail

दहावी निकाल 2022 वेबसाईट लिंक – SSC Result 2022 Website Link



Maharashtra Board 10th SSC Result 2022 : महाराष्ट्र बोर्डने इयत्ता 12 वीचा निकाल नुकताच जाहीर केलेला आहे. आता 10th SSC चे विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या या दोन परीक्षा असतात. विद्यार्थी वर्षभर या परीक्षांसाठी खूप अभ्यास करत असतात. जीवनातील महत्वाच्या परीक्षांमध्ये हि SSC Board Exam असते.
आजच्या या पोस्टमध्ये आपण Maharashtra 10th / SSC Result 2022 थोडी माहिती घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण Maharashtra 10th, SSC Result 2022 in Marathi, Maharashtra SSC Result 2022 Download Link, Maharashtra SSC Result Date 2022, SSC Exam 2022 Details आणि SSC चा निकाल २०२२ कसा चेक करायचा हे पाहणार आहोत.

दहावी निकाल 2022 | Maharashtra 10th/SSC Result 2022 Date and Time | SSC चा निकाल 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ने 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 या शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठीच्या SSC बोर्डाच्या परीक्षा विविध केंद्रांवर यशस्वीपणे पार पाडल्या. महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने विद्यार्थी बसले आहेत आणि आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. SSC Result 2022 साठी आता जास्त वाट पाहायची गरज नाही. SSC Result 2022 आज म्हणजेच 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे.

महाराष्ट्र एसएससी बोर्ड निकाल 2022 पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. कारण या वेबसाईट वरती निकाल जाहीर केला जाणार आहे, त्या वेबसाईट वरती तुम्ही निकाल चेक करू शकता. निकाल तपासण्याचे नावानुसार, एसएमएसद्वारे, शाळानिहाय आणि रोल नंबरनुसार असे अनेक मार्ग आहेत. तुमचे स्कोअरकार्ड आणि विषयानुसार गुण पाहण्यासाठी तुम्ही कोणतीही पद्धत निवडू शकता. दहावीचा निकाल कसा चेक करायचा हे सुद्धा आम्ही या पोस्ट मध्ये सांगणार आहोत. त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

दहावी निकाल 2022 – SSC Result 2022 Details

बोर्डाचे नाव –महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
परीक्षेचे नाव –SSC Exam / 10th
परीक्षेची तारीख –15 मार्च ते 4 एप्रिल 2022
निकालाची तारीख –17 जून 2022
निकालाचा वेळ –दुपारी १ वाजता
निकाल मोड –ऑनलाईन
वेबसाईट –mahresult.nic.in 

दहावी निकाल 2022 तारीख आणि वेळ – SSC Result 2022 Date and Time

2022 च्या महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे आणि हे सर्व विद्यार्थी बऱ्याच काळापासून निकालाची वाट पाहता आहेत. न्यूजमध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र बोर्डाचा अधिकृत विभाग 10 वी (SSC) चा निकाल 17 जून 2022 रोजी जाहीर करेल आणि निकालाच टाईम ची चर्चा केली तर तो दरवर्षी प्रमाणे दुपारी १ लाच जाहीर केला जाईल.

महाराष्ट्र बोर्ड 10वीच्या निकालाची तारीख आणि वेळ वरील वरती टेबलमध्ये दिलेल्या त्यांच्या अधिकृत वेबसाइट पोर्टलवर अपलोड केलेली आहे. नाव, रोल नंबर आणि जन्मतारीख यासारख्या लॉगिन क्रेडेंशियल्सच्या मदतीने विद्यार्थी एसएससी निकाल डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या निकालाबाबत अधिक अपडेट्ससाठी आमच्या ब्लॉग ला भेट देत राहा.

दहावी निकाल 2022 वेबसाईट लिंक – SSC Result 2022 Website Link

तुम्हाला 10 वी बोर्ड निकाल 2022 महाराष्ट्र बोर्ड डाउनलोड संबंधित चे सर्व नवीनतम अपडेट mahresult.nic.in या वेबसाईट वरती मिळतील. बोर्ड आता या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करत असून हे अपडेट व्हायला थोडा वेळ लागेल असे सांगितले जात होते परंतु आता जास्त वाट पाहण्याची गरज नाही 17 जून 2022 ला निकाल जाहीर केला जाणार आहे. निकाल अपडेट केवळ अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केले जातील.

खालील वेबसाईट वरती 10th Result 2022 जाहीर केला जाणार आहे –

दहावी (SSC) चा निकाल कसा बघायचा – How to Check SSC Result 2022

महाराष्ट्र बोर्ड SSC निकाल 2022 नावानुसार अधिकृत घोषणेनंतर अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध होईल. कारण अधिकृत लिंक व्यतिरिक्त निकाल मिळवण्यासाठी आमच्याकडे दुसरी लिंक अजूनही समोर आलेली नाही. त्यामुळे तुम्ही अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी आणि झटपट निकाल अपडेट्ससाठी कनेक्ट राहावे.

दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  1. सर्वात आधी https://mahresult.nic.in/ या वेबसाईट ला भेट द्या.
  2. आता Maharashtra SSC Board 2022 Results या पर्यायावरती क्लिक करा.
  3. आता आपला Roll Number, Date of Birth आणि आईचे नाव योग्य ठिकाणी प्रविस्ट करा.
  4. सर्व योग्य केल्यावर Submit बटन वर क्लिक करा.
  5. आता आपला निकाल ओपन होईल. तो चेक करा आणि PDF च्या स्वरूपात डाउनलोड करून ठेवा.

thumbnail

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PMSYM ) प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची लाभ कोणते?आणि आपण रजिस्ट्रेशन का करायचं सविस्तर वाचा



नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 2022 या योजने संदर्भात माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण काय आहे श्रमयोगी मानधन योजना, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, PMSYM योजना लाभार्थी पात्रता काय, कोण लाभ घेऊ शकत नाही, PMSYMआवश्यक कागदपत्रे कोणती, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना साठी अर्ज कुठे व कसा करायचा, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना हेल्पलाईन क्रमांक काय आहे तसेच या योजनेच्या अटी कोणत्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या लेखात मिळणार आहे. जर तुम्ही असंघटीत क्षेत्रातील कामगार असाल, तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. या योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

PM Shram Yogi Mandhan Yojana 2022

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर केली होती. आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना १५ फेब्रुवारी २०१९ पासून लागू करण्यात आलेली आहे. हि योजना वीट भट्टी कामगार, घरगुती नोकर, रिक्षाचालक, मजूर, शिंपी, मोची इत्यादी असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सुरू केलेली आहे. मासिक उत्पन्न १५,०००/- रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणारे असंघटित क्षेत्रातील कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेअंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर लाभार्थ्यांना प्रतिमहा पेन्शन देण्यात येणार आहे. ही पेन्शन दरमहा ३,०००/- रुपये दिली जाईल. आत्तापर्यंत ४४.९० लाखांहून अधिक कामगारांनी नोंदणी केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला दरमहा गुंतवणूक करावी लागणार आहे. गुंतवणूकीची रक्कम ही वयाच्या आधारावर निश्चित केली जाईल. ही रक्कम ५५/- रुपयांपासून २००/- रुपयांपर्यंत असेल. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत अंदाजे १० कोटी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची उद्दिष्ट काय?

PMSYM योजनेचे मुख्य उद्दिष्ट असंघटीत क्षेत्रातील कामगारांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन देऊन या योजनेद्वारे त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे आहे. तसेच वृद्धापकाळात त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेअंतर्गत त्यांना स्वावलंबी व सशक्त बनवणे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या वृद्धापकाळातील आयुष्य जगण्यासाठी कोणत्याही प्रकारचा सहारा नसतो. म्हणून केंद्र सरकार अशा योजना अंतर्गत सर्व गरीब आणि मजुरांना या योजने अंतर्गत प्रतिमहा ३,०००/- रुपयापर्यंत ची पेन्शन देऊन आर्थिक मदत करत आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत निश्चित उत्पन्नाचे स्रोत नसणाऱ्या अशा कामगारांना दिलासा मिळणार आहे.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची लाभ कोणते?

  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर प्रतिमहा ३,०००/- रुपये इतकी पेन्शन दिली जाईल.
  • लाभार्थ्यांची पेन्शन रक्कम ही त्याच्या प्रीमियम रकमेवर अवलंबून असेल. त्याने जेवढी योगदान रक्कम भरलेली आहे, त्या रकमेनुसार सरकार तुमच्या खात्यात पैसे जमा करेल.
  • जर लाभार्थी या योजनेअंतर्गत पेन्शन घेताना मरण पावला, तर त्याच्या पेन्शनच्या रकमेच्या ५० टक्के रक्कम त्याच्या जोडीदाराला पेन्शन म्हणून दिली जाईल. म्हणजेच लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला १,५००/- रुपये प्रतिमहा पेन्शन मिळेल.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत लाभ कोण घेऊ शकत नाही?

  • जे नागरिक आयकर भरतात असे नागरिक
  • राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सदस्य
  • संघटित क्षेत्रातील व्यक्ती
  • राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे सदस्य
  • कर्मचारी भविष्य निधी सदस्य

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो?

  • भूमिहीन शेतमजूर
  • लहान आणि सीमांत शेतकरी
  • पशुपालक आणि दगडाच्या खाणी मध्ये लेबलिंग आणि पॅकिंग करणारे
  • कोळी
  • पशुपालक
  • बांधकाम आणि पायाभूत सुविधा कामगार
  • स्थलांतरित मजूर
  • विणकर
  • सफाई कामगार
  • भाजी आणि फळविक्रेता
  • घरगुती कामगार

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची आवश्यक पात्रता काय?

  • अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांत दरम्यान असावे.
  • योजनेसाठी बँक खाते असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार असंघटित क्षेत्रातील कामगार असावा.
  • अर्जदार व्यक्तीचे मासिक उत्पन्न १५,०००/- रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराकडे आधार क्रमांक आणि मोबाईल फोन असणे आवश्यक आहे.
  • पीएम श्रमयोगी मानधन योजना अर्जदार आयकर भरणारा नसावा.
  • सरकारी कर्मचारी कर्मचारी भविष्य निधी (EPF) राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ESIC) चे सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 2022 वैशिष्ट्ये

  • अर्जदार लाभार्थी द्वारे एलआयसी कार्यालयात मासिक प्रीमियम देखील जमा केला जाईल.
  • योजना पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला मासिक पेन्शन दिली जाईल.
  • ही मिळणारी मासिक पेन्शन थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाईल.
  • या योजनेसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही लाईफ कार्पोरेशन ऑफ इंडिया कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PMSYM ) साठी अर्ज आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना  (रजिस्ट्रेशन) साठी अर्ज कसा करावा?

  • इच्छुक अर्जदाराला सर्वप्रथम प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्व कागदपत्रांसह जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रांमध्ये जावे लागेल.
  • यानंतर अर्जदाराला आपली सर्व कागदपत्रे सीएससी अधिकाऱ्याला द्यावी लागतील.
  • यानंतर सीएससी अधिकारी एजंट तुमचा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चा ऑनलाईन फॉर्म भरेल.
  • अर्ज भरून झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट तुम्हाला देईल.
  • या अर्जाची प्रिंट आउट तुम्ही तुमच्याकडे भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.
  • अशाप्रकारे तुमचा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची साठीचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होईल.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना official website


PMSYM 2022 अटी कोणत्या?

  • जर लाभार्थी दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीनंतर पण साठ वर्षाच्या व यापूर्वी या योजनेतून बाहेर पडत असेल, तर लाभार्थ्याला जमा झालेल्या व्याजासह अंशदान किंवा बचत बँक दर यापैकी जे जास्त असेल ते योगदान दिले जाईल.
  • जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाला असेल, तर त्याचा जीवन साथीदार योजना चालू ठेवू शकतो.
  • जर लाभार्थी १० वर्षांपूर्वी योजनेतून बाहेर पडला, तर योगदान बचत खात्याच्या दराने त्याला दिले जाईल.
  • जर एखादी व्यक्ती वयाच्या साठ वर्षांपूर्वी कायमस्वरूपी आश्रित बनली आणि ही योजना सुरू ठेवण्यासाठी असमर्थ असेल, तर त्याचा जोडीदार ही योजना पुढे सुरू ठेवू शकतो. या व्यतिरिक्त NSSB च्या सल्ल्यानुसार सरकार इतर निर्गमन देखील करू शकते.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना का हेल्पलाइन नंबर –

  • ई-मेल आईडी – vyapari@gov.in | shramyogi@nic.in
  • हेल्पलाईन नंबर -1800 267 6888
thumbnail

घरगुती गॅस वापरकर्त्यांना प्रति सिलिंडर 200 सबसिडी , वर्षाला 12 सिलेंवर योजना लागू , 9 कोटी जनतेला फायदा

 पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपये प्रति गॅस सिलिंडर प्रमाणे वर्षाला 12 सिलिंडरला सबसिडी मिळणार आहे अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे . आम्ही पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या 9 कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना 200 रुपये प्रति गॅस सिलिंडर ( 12 सिलिंडर ) सबसिडी दिली जाणार . यामुळे आमच्या माता - भगिनींना मदत मिळेल , असं असे त्यांनी जाहीर केली आहे .
thumbnail

पीएम किसान निधीची प्रतीक्षा संपली, या तारखेला 2000 रुपये येतील, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले, ई-केवायसी आवश्यक आहे


पीएम किसान निधीची प्रतीक्षा संपली, या तारखेला 2000 रुपये येतील, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले पीएम किसान निधी: केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एका कार्यक्रमादरम्यान पीएम किसान निधीच्या 11 व्या हप्त्याच्या तारखेशी संबंधित एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सर्व प्रकारच्या योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. PM Kisan Nidhi: PM किसान सन्मान निधीच्या 11 व्या हप्त्यासाठी देशभरातील 12.50 कोटी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले आहे की पीएम मोदी यांच्या हस्ते 11 वा हप्ता कधी जारी होणार आहे? वास्तविक, पीएम किसानचे पैसे १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान येणार आहेत. ज्याची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. एका कार्यक्रमात जाहीर केले कृषी मंत्री नरेंद्र सिंह (नरेंद्र सिंह तोमर) यांनी 11वा हप्ता हस्तांतरित करण्याच्या तारखेबद्दल सांगितले आहे. मध्य प्रदेशमध्ये आयोजित कृषी कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्र्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमात त्यांचा अक्षरश: सहभाग होता. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी 'किसान सन्मान निधी कार्यक्रम' जाहीर केला होता. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 समान हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. 31 मे रोजी पैसे येतील किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता पंतप्रधान 31 मे रोजी पुन्हा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 2021 मध्ये 15 मे रोजी सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. 15 मे जवळ असताना लाभार्थी शेतकरी 11 व्या हप्त्याची वाट पाहत होते. केंद्रीय मंत्र्यांनी तारीख जाहीर केल्यानंतर प्रतीक्षा आणखी वाढणार आहे.

 ई-केवायसी आवश्यक आहे आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी 11व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. साडे बारा कोटींपैकी जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने ई-केवायसी करू शकता. याशिवाय, तुम्ही घरी बसून पीएम किसानच्या वेबसाइटला भेट देऊन ई-केवायसी पूर्ण करू शकता.
thumbnail

Aadhaar Card :आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. आधारला मोबाईल नंबर लिंक करण्याचा त्रास संपला, टेन्शन घेऊ नका, फक्त हे करा

    सध्या आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक झालंय. कुठेही गेलं की तुमचं आधार कार्ड द्या म्हणतात. बँक (Bank), शासकीय कार्यालयं असो वा कुठेही. त्यातही तुमच्या नावात थोडाही बदल असला की ते बदलण्याची डोकेदुखी असतेच. आधार कार्डला अनेकदा पॅन (PAN) कार्ड लिंक नसल्यासंही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी पुन्हा वेगळी माहिती देऊन ते अपडेट करावं लागतं. या सगळ्यात मोबाईल नंबर (mobile number) आधार कार्डसोबत लिंक असण्याची प्राथमिकता असते. कारण, आधार कार्डशी संबंधित कोणताही व्यवहार असला की आपल्याला ओटीपी येतो. त्यासाठी आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असतं. त्याआधी आधार कार्ड कसं मिळवता येईल? यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. हे फॉलो केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड सहज मिळेल.

    नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाशिवाय आधार कसा मिळवायचा-

    लक्षात ठेवा की नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाशिवाय तुम्ही आधार ऑनलाइन मिळवू शकत नाही. खाली दिलेल्या पायऱ्यांचं नुसरण करून तुम्ही मोबाईल नंबरशिवाय आधार मिळवू शकता.

    1. तुमच्या आधार क्रमांकासह जवळच्या आधार केंद्राला भेट द्या
    2. आता आवश्यक बायो-मेट्रिक तपशील पडताळणी करा जसे की थंब व्हेरिफिकेशन आणि रेटिना स्कॅन इ.
    3. तुमच्यासोबत पॅन आणि ओळखपत्र सारखे इतर ओळखीचे पुरावे सोबत ठेवा
    4. प्रक्रियेनंतर, केंद्रातील संबंधित व्यक्तीकडून तुम्हाला तुमच्या आधारची प्रिंट आऊट दिली जाईल. सामान्य कागदाच्या स्वरूपात तयार केलेल्या आधारसाठी 50 रुपये आणि पीव्हीसी आवृत्तीसाठी 100 रुपये द्यावे लागतील.

    आधार कार्डसाठी नावनोंदणी

    आधार केंद्र किंवा बँक/पोस्ट ऑफिसला भेट देऊन कोणतीही व्यक्ती आधार कार्डसाठी नावनोंदणी करू शकते. यानंतर तो UIDAI द्वारे जारी केलेल्या एनरोलमेंट आयडी, व्हर्च्युअल आयडीद्वारे त्याचे आधार कार्ड प्रिंट करू शकतो. आधार क्रमांक दिल्यावर तुम्‍ही त्याचे आधार कार्ड वेगवेगळ्या प्रकारे डाउनलोड किंवा प्रिंट करू शकतात. या आधार कार्डचा वापर कोणत्याही सरकारी योजनेसाठी करता येतो.

    आधार कार्ड का गरजेचं?

    आधार कार्ड आवश्यक झालंय. कुठेही गेलं की तुमचं आधार कार्ड द्या म्हणतात. बँक, शासकीय कार्यालयं असो वा कुठेही. त्यातही तुमच्या नावात थोडाही बदल असला की ते बदलण्याची डोकेदुखी असतेच. आधार कार्डला अनेकदा पॅन कार्ड लिंक नसल्यासंही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी पुन्हा वेगळी माहिती देऊन ते अपडेट करावं लागतं. या सगळ्यात मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक असण्याची प्राथमिकता असते. म्हणून वरील दिलेल्या पायऱ्या वापरा आणि भविष्यातील अडचणी दूर करा.


thumbnail

Post Office Investment | गुंतवणुकीसाठी 5 वर्षाची मुदत ठेव योजना चांगली की NSC ? | फायदा कुठे जाणून घ्या Post Office Investment |

Post Office Investment |  5 year term deposit plan for investment or NSC?  |  Find out where the benefits are Post Office Investment


पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर अशा अनेक योजना आहेत , ज्यात तुम्ही पैसे गुंतवू शकता . पण जर तुम्हाला 5 वर्षांच्या स्कीममध्ये एकरकमी गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट किंवा नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीम ( पोस्ट ऑफिस एनएससी ) चा पर्यायही निवडू शकतं . आता या दोन्ही योजनांपैकी कोणती योजना अधिक चांगली आहे , हे आपण येथे समजू If you want to make a lump sum investment in the 5 - year scheme , then the post office can also opt for the National Saving Time Deposit or the National Savings Certificate Scheme : खाते उघडण्यासाठी किती पैसे लागतात : पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉजिट आणि नॅशनल सेव्हिंग स्कीम हे दोन्ही अकाउंट १००० रुपयांना उघडले जातात आणि १०० रुपयांच्या पटीत तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता . पोस्ट ऑफिसच्या दोन्ही योजनांमध्ये सिंगल ते तीन लोक मिळून जॉइंट अकाउंटही उघडू शकतात . नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉजिट अकाउंट अल्पवयीन मुलाच्या नावे गार्डियन खाते उघडू शकते . १० वर्षांवरील अल्पवयीन मुलाच्या नावावरही खाते चालू शकते . कोणत्या योजनेत किती व्याज मिळते : अधिकृत वेबसाइटनुसार , पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट स्कीमसाठी ५ वर्षांसाठीचा व्याजदर सध्या वार्षिक ६.७ टक्के आहे , तर पाच वर्षांच्या पोस्ट ऑफिस योजनेत वार्षिक ६.८ टक्के चक्रवाढ व्याजदर लागू असला तरी तो मॅच्युरिटीवर दिला जातो . करसवलतीचे फायदे : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील गुंतवणुकीवर तुम्ही आयकर सूटही घेऊ शकता . तसेच 5 वर्षांच्या मुदत ठेवीत गुंतवणुकी अंतर्गत आयकर कायदा 1961 च्या कलम 80 सी चा लाभ घेता येईल . पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉजिट स्कीममध्ये तुम्हाला हवी तेवढी खाती उघडता येतात 
thumbnail

PM Kisan Yojana शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत 6 हजार रुपये वाट कसली बघताय आताच करा मग हे काम

 PM Kisan Yojana | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने ( PM Kisan Yojana ) अंतर्गत मोदी सरकार देशातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपयांचा हप्ता टाकते . आतापर्यंत या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 10 हप्ते वर्ग करण्यात आले आहेत. परंतु जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही ई केवायसी पूर्ण केले नसेल , तर यावेळी तुम्हाला 11 वा हप्ता मिळणार नाही . ई - केवायसी म्हणजेच बँक खात्यासह , तुम्हाला तुमची आवश्यक कागदपत्रे देखील सबमिट करावी लागतील आणि तुमच्याबद्दल संपूर्ण माहिती द्यावी लागेल . ( PM Kisan Yojana )
असे पूर्ण करा eKYC जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन तुमचे केवायसी पूर्ण करू शकता . परंतु हे काम घरबसल्या करायचे असेल तर ही सुविधाही उपलब्ध आहे . तुम्हाला तुमचे ई - केवायसी 22 मे 2022 पर्यंत पूर्ण करावे लागेल . - यासाठी सर्वप्रथम PM किसान योजनेचे अधिकृत पोर्टल पीएम किसान सन्मान निधीच्या रूपात दरवर्षी 6,000 रुपये मिळतात , ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जारी केली जाते , जी दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते . Web PM KISAN ला भेट द्या आणि होमपेजवरील Farmers Corner वर क्लिक करा .
- यानंतर , ई - केवायसी पर्याय निवडून एक नवीन पेज ओपन होईल . आधार कार्डची माहिती दिल्यानंतर आता सर्च टॅबवर क्लिक करा . यानंतर , नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी सबमिट करा , तुमचे ई - केवायसी आता पूर्ण झाले आहे आणि आता 6,000 रुपयांचा 11 वा हप्ता देखील तुमच्या खात्यात येईल .
पीएम किसान सन्मान निधीच्या रूपात दरवर्षी 6,000 रुपये मिळतात , ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जारी केली जाते , जी दर चार महिन्यांच्या
अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते . 

PM Kisan Yojana |  Under the Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana (PM Kisan Yojana), the Modi government pays an annual installment of Rs 6,000 into the accounts of all farmers in the country.  So far, 10 installments have been disbursed to farmers' bank accounts under this scheme.  But if you are a farmer and you have not completed e KYC, you will not get 11th installment this time.  Along with e-KYC i.e. bank account, you will also need to submit your required documents and provide complete information about yourself.  (PM Kisan Yojana)

 How to complete eKYC You can complete your KYC by visiting the nearest Common Service Center.  But this facility is also available if you want to do this work from home.  You have to complete your e-KYC by 22nd May 2022.  - For this first of all PM Kisan Yojana's official portal PM Kisan Sanman Nidhi gets Rs. 6,000 per annum, this amount is released in three installments of Rs.  Visit the Web and click on Farmers Corner on the homepage.

 - After this, a new page will open by selecting e-KYC option.  Now click on Search tab after providing Aadhar Card information.  After that, submit the OTP received on the registered mobile number, your e-KYC is now complete and now the 11th installment of Rs. 6,000 will also be credited to your account.

 The PM receives Rs. 6,000 per annum in the form of Kisan Sanman Nidhi, which is released in three installments of Rs.
thumbnail

pm kisan list तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार रुपये


पंतप्रधान मोदी सातत्याने डिजिटल इंडियावर जोर देत असतात. याचाच एक भाग म्हणून PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, बँक खात्यात किती पैसे आले व कधी आले? याबाबतची माहिती मिळण्यास अडचण येते. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारद्वारे pm kisan list अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने शेतकरी घरबसल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, याची माहिती घेऊ शकतील. हे अ‍ॅप कसे डाउनलोड करू शकता व याचे फायदे काय, ते जाणून घेऊया.
                      येथे क्लिक करा

सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या या अ‍ॅपला तुम्ही अँड्राइड pm kisan list प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजीसह जवळपास ८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी या अ‍ॅपवर आधार कार्ड, बँक खाते नंबर आणि मोबाइल नंबरच्या मदतीने किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व माहिती घेऊ शकतात. याशिवाय, बँक खात्यात कधी व किती पैसे जमा झाले याची देखील माहिती मिळेल. हे एक सरकारी अ‍ॅप आहे, त्यामुळे प्रायव्हसीबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, अ‍ॅपला तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.

thumbnail

राशनकार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे.लाखो अपात्र लोक लाभ घेत असल्याचं सरकारच्या गेल्या काही दिवसांत नजरेत आलं. सविस्तर माहिती पहा


राशनकार्ड धारकांसाठी (Ration Card Holder) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सरकारने कोरोनाच्या काळात गरिबांसाठी मोफत रेशनची व्यवस्था सुरू केली होती. मात्र,  मिळणाऱ्या मोफत रेशनचाही लाखो अपात्र लोक लाभ घेत असल्याचं सरकारच्या गेल्या काही दिवसांत नजरेत आलं. (your ration card will be canceled in these 4 situations know what are the latest rules) 

कारवाही शक्यता

त्यामुळे जनतेने पुढाकार घेऊन स्वतःची शिधापत्रिका रद्द करून घ्यावी, असं आवाहन सरकारतर्फे जनतेला करण्यात आलंय. शिधापत्रिका रद्द न केल्यास पडताळणीनंतर अन्न विभागाचे पथक ते रद्द करेल. तसेच योजनेचा गैरफायदा घेतलेल्या राशनकार्ड धारकांवर कारवाई होऊ शकते.

नियम काय आहेत?

जर एखाद्या कार्ड धारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर असेल, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, गावात 2 लाखांपेक्षा जास्त आणि शहरात वार्षिक 3 लाखांचे कौटुंबिक उत्पन्न असेल, तर अशा लोकांनी स्वतःचे  रेशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल.

....तर वसूली होणार

शासनाच्या नियमानुसार शिधापत्रिका धारकाने कार्ड सरेंडर न केल्यास, पथक छाननी करेल. त्यानंतर छाननीत अशा लोकांचं रद्द केलं जाईल. यासोबतच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर अशा लोकांकडून तो रेशन घेत असल्याने रेशनही वसूल केलं जाईल. 

thumbnail

pm kisan list तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार रुपये नसेल आले तर आता करा हे काम

पंतप्रधान मोदी सातत्याने डिजिटल इंडियावर जोर देत असतात. याचाच एक भाग म्हणून PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, बँक खात्यात किती पैसे आले व कधी आले? याबाबतची माहिती मिळण्यास अडचण येते. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारद्वारे pm kisan list अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने शेतकरी घरबसल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, याची माहिती घेऊ शकतील. हे अ‍ॅप कसे डाउनलोड करू शकता व याचे फायदे काय, ते जाणून घेऊया.
हे पण पहा
pm kisan list तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार रुपये नसेल आले तर आता करा हे काम


सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या या अ‍ॅपला तुम्ही अँड्राइड pm kisan list प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजीसह जवळपास ८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी या अ‍ॅपवर आधार कार्ड, बँक खाते नंबर आणि मोबाइल नंबरच्या मदतीने किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व माहिती घेऊ शकतात. याशिवाय, बँक खात्यात कधी व किती पैसे जमा झाले याची देखील माहिती मिळेल. हे एक सरकारी अ‍ॅप आहे, त्यामुळे प्रायव्हसीबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, अ‍ॅपला तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.

thumbnail

शेतकरी बांधवांनो आपण Pm Kisan Kyc केली असेल . परंतु आपली केवायसी झाली आहे का ? ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे आहे .

Pm Kisan Beneficiary Status 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत . शेतकरी बांधवांनो आपण Pm Kisan Kyc केली असेल . परंतु आपली केवायसी झाली आहे का ? ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे आहे .लाल किंवा आपल्या लाभार्थ्यांची स्टेटस आपला काय दाखवत आहे . हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे . आणि त्यामध्ये आपल्याला कळणार आहे की आपल्याला 11 वा हफ्ता मिळू शकतो की नाही . तर यामध्ये आपली केवयासी झाली आहे की नाही ऑनलाईन चेक कसे करायचे . त्याचबरोबर पात्र यादी ही कशी पहायची आपलं स्वतःचं लाभार्थी स्थिति कशी ऑनलाईन चेक करायची . संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा यामध्ये दिली संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता .



Pm Kisan Beneficiary Status 
● तुमच्या डिव्हाइसचा वेब ब्राउझर उघडा वेबसाइटला भेट द्या • Pmkisan.gov.in नंतर खाली स्क्रोल करा 
● Beneficiary List वर क्लिक करा 
• एक नवीन पृष्ठ Open होईल दिलेल्या पर्याय मधून एक पर्याय निवडा 
● म्हणजे आधार क्रमांक , खाते क्रमांक निवडलेले माहिती भरा प्रविष्ट करा व ते सत्यापित करा त्यानंतर " Get Data " वर क्लिक करा 
• PM किसान लाभार्थी यादी स्क्रीनवर पहा

pm kisan 11th installment date 
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 11 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी दिला जाऊ शकतो . तर शेतकऱ्यांना अकरा वा हफ्ता हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा मे दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा होऊ शकतो . अशी माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्या . जेणेकरून येणाऱ्या पुढील 2 हजार रुपयांचा लाभ आपल्याला दिला जाणार . पीएम किसान पात्र शेतकरी यादी आपण वैयक्तिक स्टेटस आपलं पाहू इच्छित असाल तर बेनिफिशियरी स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे . किंवा आपल्या गावाची संपूर्ण पात्र लाभार्थ्यांची यादी पाण्यासाठी बेनिफिशियरी लिस्ट यावर ती क्लिक करून पहा . अश्याप्रकारे सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकणार आहात . आणि आपण व्हिडिओच्या द्वारे यादी कशी पहायची ती माहिती किंवा तो व्हिडिओ पाह

Pm Kisan Aadhaar Bank Link Status
 महत्त्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे आता आपले स्टेटस म्हणजेच आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहेत का . किंवा आपलं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहेत का हे जाणून घेणे गरजेचे आहे . आपलं आपण केवायसी केली असेल तर त्या ठिकाणी दिसून आले असेल आधार verify हे दिसून येत आहे . त्यामुळे आता शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे . आणि त्याच बँकेत आता इथून पुढे पैसे येणार आहे . तरी चेक कसे करायचे या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहे . ( Pm Kisan Beneficiary Status 2022 ) ती आपण एकदा नक्की पहा .

thumbnail

सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ३६ हजार रुपये , जाणून घ्या अटी


Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना (Farmer) वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते, या योजनेचा लाभ देशभरातील शेतकरी घेत आहेत.

त्यामुळे जर तुम्हाला पीएम किसान (PM Kissan Yojna) सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, परंतु यासाठी काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

आता घरी बसलेल्या वृद्धांना सरकार दरमहा ३,००० रुपये पेन्शन (Pension) देणार आहे, ज्यासाठी तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक (Important) आहे. मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ त्या सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो, जे पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत.

त्याच वेळी, १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत आहेत, केंद्र सरकार (Central Government) पीएम किसानच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ देत आहे.

मानधन योजनेसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्याच वेळी, त्यात सामील होऊन, तुम्ही खिशातून खर्च न करता वार्षिक ३६,००० मिळवू शकता.


दरवर्षी इतके हजार रुपये कमवा

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याची योजना आहे. यामध्ये वयाच्या ६० नंतर प्रत्येक महिन्याला ३००० रुपये म्हणजेच वार्षिक ३६००० रुपये पेन्शन दिले जाते. जर एखादा शेतकरी पीएम-किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही.

पीएम-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देण्याचा पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्याला थेट खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. ६०००, त्याचा प्रीमियम देखील कापला जाईल. शेतकऱ्याला खिशातून खर्च न करता वार्षिक ३६००० आणि काही हप्ते देखील मिळतील.

किसान मानधन योजनेअंतर्गत १८-४० वर्षांपर्यंतचा कोणताही शेतकरी यामध्ये नोंदणी करू शकतो. मात्र, ज्यांच्याकडे जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन आहे तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

त्यांना किमान २० वर्षे आणि कमाल ४० वर्षे या योजनेंतर्गत ५५ ते २०० रुपये मासिक योगदान द्यावे लागेल. जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी सामील झालात तर मासिक योगदान दरमहा ५५ रुपये असेल. जर तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर दरमहा ११० रुपये द्यावे लागतील.

thumbnail

पीएम किसान सन्मान निधीमध्ये E-KYC सुविधा रद्द, शेतकऱ्यांना बसणार फटका; जाणून घ्या योजनेबद्दल नवीन अपडेट

 


Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी (farmer) आर्थिक मदत म्ह्णून वार्षिक ६ हजार रुपये देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) ही महत्त्वाची योजना राबवली आहे.

हे पण वाचा👇👇👇

Land Record 1880 जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर

या योजनेमध्ये वेळेनुसार नवनवीन बदल करण्यात आले असून याआधी या योजेनचा १० वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (bank Account) पाठवण्यात आला आहे. तसेच सरकार लवकरच २००० रुपयांचा ११ वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. सरकारने या सेवेत बदल केले आहेत. आता आधार OTP द्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे.

ई-केवायसी (E-KYC) करण्याच्या पद्धतीत बदल

किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर आधार ओटीपीद्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. आता तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी इतर पद्धती वापराव्या लागतील.

याचा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे

सरकारच्या या बदलाचा परिणाम अशा शेतकऱ्यांवर होणार आहे ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही कारण सरकारने ओटीपीद्वारे ई-केवायसी करण्याची सेवा निलंबित केली आहे.

तथापि, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, ते आता जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल. तरच ते शेतकरी ११ व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकतील.

दहाव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत

काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दहाव्या हप्त्याचे पैसे पोहोचलेच नाहीत. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नसल्याचे समोर आले. अलीकडेच, सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे.

सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत दोनदा वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना ३१ मे पर्यंत ई-केवायसी करावे लागेल, त्यानंतरच पुढील हप्ता त्यांच्या बँक खात्यात येईल.

About

Business/feat-big
Adbox

Welcome To SoraBook

You can use this area to describe the Books and your blog. . This responsive template is ideal for posting many types of digital products such as e-books, audio CDs, DVDs, paintings, photographs or any form of digital art or products.


Ok
Nath E- Maha Seva Kendra.

Contact form

पीएम किसानचे 2 हजार रुपये अजून पर्यंत खात्यावर आले नसतील तर घाबरू जाऊ नका, वाचा सविस्तर माहिती..!

आतापर्यंत केंद्र सरकारद्वारे देशातील शेतकर्‍यांना यशस्वीरीत्या 12 हप्ते पाठविण्यात आले आहे. अलीकडेच ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारने (Central Government of India) शेतकर्‍यांच्या खात्यावर 12 वा हफ्ता पाठविला आहे. हे पैसे डीबीटीद्वारे पाठविण्यात येतात. मिळालेल्या माहितीनुसार 8 कोटी पेक्षा जास्त शेतकर्‍यांना 16 हजार कोटी हस्तांतरित केले आहे. पण महत्वाची माहिती अशी की अलीकडे पीएम किसानचे हफ्ते मिळण्याच्या संदर्भात बर्‍याच शेतकर्‍यांच्या तक्रारी ऐकायला येत आहे. (PM Kisan Scheme)..

अलीकडेच असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना पीएम किसान योजनेचा 12 वा हफ्ता मिळाला नाही. याला अनेक कारणे आहेत. त्यापैकी आधार क्रमांक बरोबर दिलेला नसणे, बँक अकाऊंट नंबर मध्ये देखील चूक असणे तसेच अजून पर्यंत E-kyc झालेली नसणे हे कारणे आहेत. त्यासाठी तुम्ही एक काम करू शकता.
तुमच्या मोबाइल वरून pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तिथे दिलेल्या माहितीची शहानिशा करू शकता. जर तुमच्याकडून ही प्रक्रिया मोबाइल वर करणे शक्य नसेल तर जवळील CSC सेंटरला भेट देऊन चौकशी करून घ्या. किंवा तुम्ही पीएम किसान योजनेशी संबधित संपर्क क्रमांक व ईमेल वर तक्रार देखील करू शकता.
या नंबर वर करा तक्रार
योजने संदर्भात तक्रार किंवा मदतीसाठी याठिकाणी ईमेल व संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे. येथे संपर्क करून तुम्ही आपली माहिती देऊ शकता. त्यासाठी एक टोल फ्री क्रमांक आहे – 1800115526, 011-23381092 तसेच ईमेल देखील करता येतो. योजने संदर्भात काहीही माहितीसाठी pmkisan-ict@gov.in या ईमेल वर वर ईमेल पाठविता येतो.

फक्त गट नंबर टाका व कोणत्याही जमिनीचा नकाशा मोफत मोबाईलवर पहा

शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत 

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

गट नंबर टाकून नकाशा डाऊनलोड करण्यासाठी
              👉👉येथे क्लिक करा 👈👈

जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या वेब साईट वर जायचं आहे.
या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे

त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो.
होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.
त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो म्हणजेच झूम इन किंवा झूम आऊट करता येतो.
पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे Mp Land Record.
आता जमिनीचा नकाशा कशा काढायचा ते पाहूया.
या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.
इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.
होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.
आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते Mp Land Record.
ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो.
यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा plot report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.
त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. जसं की इथं 337 या गटाशेजारी 329, 338, 340,341,346,336 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसतात.
आणि मग खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

अशीच मुलींसाठी एक लोकप्रिय सरकारी योजना आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना

पालक आपल्या मुलांच्या भविष्याबाबत फार सजग असतात. त्यामुळे त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मुलं लहान असल्यापासून ते अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. मुलं लहान असताना केलेली गुंतवणूक पुढे त्यांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी उपयोगी पडू शकते, असा पालकांचा विचार असतो.

अशीच मुलींसाठी एक लोकप्रिय सरकारी योजना आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. अनेक पालक आपल्या मुलीच्या लग्नासाठी बचत म्हणून या योजनेत गुंतवणूक करतात. या योजनेत गुंतवणूक करावी की नाही, असा प्रश्नही काही पालकांना पडतो, त्यामुळे या योजनेचे फायदे, व्याजदर आणि त्या संदर्भातील इतर गोष्टी जाणून घेऊयात.

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदेसुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, शिवाय गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे मोठी रक्कम असावी असंही नाही. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही वर्षाला किमान 250 रुपये आणि जास्तीतजास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत सूटही मिळते. त्यामुळे ही गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.
योजनेचा व्याज दर किती
सध्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.6 टक्के व्याजदेखील मिळतं. या योजनेत गुंतवणूक केल्यास काही वर्षांच्या कालावधीत तुमचे पैसे दुप्पट होतात. त्यामुळे पालक या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देतात.

मुदत संपल्यावर किती रक्कम मिळते.
सध्याच्या व्याजदरानुसार, जर प्रत्येक आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये असे 15 वर्षांसाठी जमा केले, तर तुमच्याद्वारे जमा केलेली एकूण रक्कम 22,50,000 रुपये असेल आणि त्यावरचे व्याज 41,36,543 रुपये असेल. तसंच 21 वर्षं पूर्ण झाल्यानंतर या गुंतवणुकीची मुदत पूर्ण होईल. अशा परिस्थितीत खात्यावर जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत राहील.
21 वर्षांपर्यंत ही रक्कम व्याजासह सुमारे 64 लाख रुपये होईल. एक नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी की सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याज केंद्र सरकार दर तिमाहीत ठरवते. त्यामुळे मुदत पूर्ण होईपर्यंत अनेक वेळा व्याजदर बदलू शकतात. अगदी वर्षाला दीड लाख रुपये गुंतवणं प्रत्येक पालकाला शक्य नसलं तरीही व्याजदर चांगला मिळत असल्याने ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. या योजनेत गुंतवलेले पैसे मध्ये काढता येत नाहीत.
सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्याची प्रोसेस

सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी मुलीच्या पालकांना जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जावं लागेल. येथे तुम्हाला अर्जाचा फॉर्म मिळेल. या अर्जामध्ये, तुम्हाला तुमची सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल. यानंतर, तुमची सर्व आवश्यक कागदपत्रं या फॉर्मसोबत जोडून पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत सबमिट करा. या सोप्या प्रक्रियेचं अनुसरण करून, तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खातं सहज उघडू शकता.
हे सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे आहेत. प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे कुटुंबाच्या इतर खर्चांमध्ये वेगळी अशी बचत करणं मध्यमवर्गीय पालकांना अवघड होतं. या योजनेत व्याज दर चांगला असल्याने थोडी रक्कम यात गुंतवली तरीही फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने योजनेबद्दल समजून घेऊन नंतरच मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक करायची की नाही, या संदर्भातला निर्णय घ्यावा.

UIDAI तुमचे आधार तुम्हीच करू शकता अपडेट लवकरात लवकर करा तुमच्या मोबाईलवर अपडेट नाहीतर होऊ शकते बंद

UIDAI : नमस्कार मित्रांनो पीआयबी(PIB) म्हणजे त्याला आपण प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो असे म्हणतो यांनी एक महत्त्वाची अशी नोटीस जाहीर केलेले आहे.या अंतर्गत नागरिकांना अशी माहिती देण्यात आलेली आहेत की जर तुम्ही तुमचे आधार कार्ड १० वर्षापासून अपडेट केले नसेल तर तुमचे आधार कार्ड बंद करण्यात येणार आहे.आणि या नोटीसमध्ये सांगितले आहे की ज्या ज्या नागरिकांनी हे आधार कार्ड अपडेट केलेली नाही.त्यांनी लवकरात लवकर आपल्या आधार कार्ड अपडेट करून घ्यावी नाहीतर आपले आधार कार्ड बंद होऊ शकते.तर आता आपण पाहू या आधार कार्ड कसे अपडेट करावे.

पीआयपी(PIB) ने काय नोटीस दिली UIDAI ?

गेल्या दहा (10) वर्षांमध्ये, आधार क्रमांक व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना UIDAI आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी, सामान्य लोकांना आधार डेटा नवीनतम वैयक्तिक तपशीलांसह अद्यतनित करणे आवश्यक आहे जेणेकरून आधार प्रमाणीकरण / पडताळणीमध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही.

ज्या व्यक्तींनी ’10’ वर्षांपूर्वी त्यांचे आधार बनवले आहेत आणि त्यानंतर या वर्षांत अपडेट केलेले नाहीत, अशा आधार क्रमांक धारकांना कागदपत्रे अपडेट करण्याची विनंती केली जाते. त्यानुसार, या संदर्भात, UIDAI ने आधार क्रमांक धारकांना विहित शुल्कासह दस्तऐवज अद्यतनाची सुविधा प्रदान केली आहे, ज्याद्वारे आधार क्रमांक धारक वैयक्तिक ओळखीचा पुरावा (POI) आणि पत्ता पुरावा (POA) दस्तऐवज अद्यतनित करू शकतात. आधार डेटा. आहे.

Indian post bharti : पोस्ट ऑफिस मध्ये नवीन भरती सुरू,पगार तब्बल 63000 रुपये, पात्रता फक्त आठवी पास.

Indian post bharti 2022 नमस्कार माझा विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी काही खास अशी बातमी घेऊन आलो आणि ही बातमी अशी ही पोस्ट ऑफिस मध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे आणि आपण कालच एक पोस्ट ऑफिस भरती विषयी जाहिरात टाकलेली होती पण ती मित्रांनो ड्रायव्हर या पदांसाठी होती आणि आता ही जी भरती नवीन निघालेली आहे वेगवेगळ्या काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो या भरतीसाठी तुम्हाला फक्त एक ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे आणि अर्ज करण्या अगोदर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला कोणत्या पोस्ट आहेत तसेच यासाठी पगार काय मिळणार आहे ही सर्व तुम्हाला माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून मिळणार आहे.
Indian Post Recruitment 2022
मित्रांनो ही भरतीची जाहिरात ही शंभर टक्के खरी असून यामध्ये आपण शासकीय भरतीची अधिकृत जाहिरातीची लिंक सुद्धा दिली आहे ती तुम्ही वरती द्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता मित्रांनो यामध्ये फक्त आठवी ते दहावी पास विद्यार्थी मित्रांसाठी भरती आहे तर मित्रांनो खाली पूर्ण पहा पूर्ण माहिती घ्या आणि मगच अर्ज करा खाली सर्व माहिती दिली आहे कोणती पदे रिक्त आहेत आणि सर्वात शेवटी अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिलेली आहे.
 
रिक्त पदे खालीलप्रमाणे आहेत
 एम.व्ही.मेकॅनिक
एम.व्ही. इलेक्ट्रिशियन
चित्रकार
वेल्डर
सुतार

या पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय आहे ?

 

वरील दिलेल्या सगळ्या पदांसाठी अर्ज तुम्हाला करायचा असेल तर यासाठी शैक्षणिक पात्रता जास्त नाहीये फक्त आठवी पास असला पाहिजे आणि तसंच आयटीआय पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे. आयटीआय कोणचा ग्रेड मधील करायचा त्यासाठी पूर्ण माहितीसाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या “Indian Post Recruitment 2022”

 

पदांसाठी इतका मिळणार पगार.

एम.व्ही.मेकॅनिक – 19,900 – 63,200 रुपये दर महा मिळेल
एम.व्ही. इलेक्ट्रिशियन – 19,900 – 63,200 रुपये दरमहा मिळेल.
चित्रकार – 19,900 – 63,200 रुपये दरमहा मिळेल.
वेल्डर – 19,900 – 63,200 रुपये दरमहा मिळेल.
सुतार – 19,900 – 63,200 रुपये दरमहा मिळेल

नियमित कर्जमाफी अनुदान बँक खात्यात जमा, नवीन GR आला पहा | नियमित कर्जमाफी 50000 अनुदान योजना 2022



Niyamit Karjmafi 50000 Anudan Yojana – सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती.

Niyamit Karjmafi 50000 Anudan Yojana

त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणेबाबत दिनांक 27.07.2022 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुसार सहकार विभागाच्या संदर्भ क्र. 1 दिनांक 20.07.2022 च्या शासन निर्णयान्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनायोजना 2010 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तसेच, सदर योजनेसाठी सहकार विभागाच्या संदर्भाधीन क्र.2 दि.02.08.2022 च्या शासन निर्णयान्वये नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्यात आले आहे.

शासन निर्णय

सन 2022 – 23 या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मजूर निधीपैकी रु. 2350.00 कोटी (रु. दोन हजार तिनशे पन्नास कोटी फक्त) इतकी रक्कम महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर)(कार्यक्रम) (2435 0189), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

आता एका ग्राहकाला वर्षात एवढेच गॅस सिलेंडर मिळणार | lpg gas cylinder update

lpg gas cylinder update

ग्राहकांना आता नव्या नियमानुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त 15 सिलिंडर मिळणार आहेत. तसेच कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही. तिन्ही तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

आतापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेवढे सिलिंडर मिळत होते. तथापि, नव्या नियमानुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात 15 सिलिंडरच मिळणार आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादिबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलिंडरसंदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच याची तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.

वर्षात एवढेच गॅस सिलेंडर

अनेकदा व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. यासंदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर येत असल्यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. अ

नुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी नोंदणी केलेल्यांना त्या दराने वर्षभरात केवळ 15 सिलिडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलिंडरची गरज भासल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलिडर घ्यावे लागेल. एखाद्या ग्राहकाला गॅसची जास्त किंमत मोजावी लागत असेल, तर त्याचा पुरावा देऊन त्याला तेल कंपनीच्या अधिका-यांची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतरच संबंधित ग्राहकाला अतिरिक्त रीफिल मिळू शकेल, असे सांगण्यात आले आहे.


शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार आर्थिक मदत


शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार आर्थिक मदत. ज्या शेतकऱ्यांची दुधाळ किंवा इतर जनावरे लम्पी आजाराने दगावली असतील आशा शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने 30 हजार ते 16 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.


शेतकऱ्यांना दिली जाणारी ही मदत राष्ट्रीय आप्पती निवारण धोरणामधील निकषानुसार दिली जाणार आहे.
केंद्राने प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 यानुसार लम्पी हा जनावरांना होणारा चर्म रोग अनुसूचित करण्यात आलेला आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यातील एकूण 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांना हा रोग झालेला आहे.
सगळ्यात अगोदर हा लम्पी चर्मरोग दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यामध्ये आढळून आला होता.

त्यानंतर महाराष्ट्रतील 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनास या रोगाची लागण झाली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनास लम्पी हा रोग झालेला आहे अशा शेतकऱ्यांना आता शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार रुपये आर्थिक मदत निकष खलीलप्रमाणे

ज्या शेतकऱ्यांना 30 हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे ते खलील पद्धतीने मिळणार आहेत.


1) ज्या शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे असतील आणि ही जनावरे या रोगाने प्रभावित झाली असतील तर अशा पशुपालकांना 30 हजार रुपये प्रती जनावर या प्रमाणे 90 हजार आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांकडील केवळ तीनच जनावरांना याचा लाभ मिळणार आहे.

2) जनावरांचा मृत्यू लम्पी रोगाने झाला असेल तरच ही मदत दिली जाणार आहे.

तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लम्पी आजाराने जनावरे दगावले तर आर्थिक मदत मिळणार आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

शेती पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे असतात. अशावेळी या जनावरांना लम्पी रोग झाला तर खूप मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावी लागते.

केवळ दुधाळ जनावरेच नव्हे तर शेतीसाठी लागणारे बैल देखील शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत.
दुधाळ जनावरांना लम्पी झाला तर दुधावर परिणाम होतो आणि बैलांना जर हा रोग झाला तर शेतीकामावर परिणाम होतो.


अशावेळी शेती मशागतीची कामे व दुग्धव्यवसाय प्रभावित झाल्याने खूप मोठे नुकसान होते.
यामुळे शासनाच्या वतीने दिली जाणारी ही मदत नक्कीच शेतकऱ्यांना सहाय्य ठरणार आहे.

कसे मिळणार 90 हजार आर्थिक मदत?

ज्या शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांना लम्पीरोग झाला आहे आणि त्यामुळे मृत्यू झाला आहे त्यांना एका जनावरांसाठी 30 हजार याप्रमाणे 3 जनावरांसाठी 90 हजार मदत मिळेल

मदतीचे निकष काय आहेत?

ही मदत फक्त लम्पी रोगाने मृत्यू झालेल्या जनावरांसाठी आहे

योजनेची अधिक माहिती कोठे मिळेल?

हा लेख पूर्ण वाचल्यास योजनेची पूर्ण माहिती मिळेल. यासंदर्भात शासन निर्णय देखील तुम्ही बघू शकता

पीएम किसान योजनेत महत्त्वाचे बदल, आता 'या' कागदपत्रांची करावे लागेल पूर्तता

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सरकारने पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार आता नोंदणीच्या (रजिस्ट्रेशन) दरम्यान राशन कार्डशी संबंधित सर्व माहिती देणे आवश्यक केले आहे. आता तुम्हाला नोंदणी करताना राशन कार्डही अपलोड करावे लागेल. अन्यथा तुम्हाला पुढील हप्त्याची रक्कम मिळणार नाही. (PM Kisan Samman Yojana New Changes In This Scheme, These Documents Compulsory)
या बरोबरच सरकारने योजनेचे लाभ सुरु राहण्यासाठी ई-केवायसी भरणेही अनिर्वाय केले आहे. वास्तविक सरकारने पीएम किसान सन्मान योजनेत होत असलेल्या फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी हे बदल केले आहेत. या योजनेत कुटुंबाचा एक सदस्य पती किंवा पत्नीच पैसे घेऊ शकतात. सरकारने स्पष्ट केले आहे, की ज्या शेतकऱ्यांजवळ राशन कार्ड आहे, त्यांनी पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in वर जाऊन आपली नोंदणी करु शकतात. या व्यतिरिक्त शेतीचा सातबारा, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचा क्रमांक असणे आवश्यक आहे. या बरोबरच संकेतस्थळावर राशन कार्ड क्रमांकासह मागितलेले कागदपत्रांची साॅफ्ट काॅपी अपलोड करणे ही आवश्यक आहे.
ई-केवायसी आहे आवश्यकशेतकऱ्यांना (Farmer) ई-केवायसी करण्यासाठी ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदत दिली गेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांना लाभ मिळालेला नाही. जर तुम्ही ई केवायसी केले नसेल तर लवकरात-लवकर ते करा.

Army Agnipath) भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022

(Army Agnipath) भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव1अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD)]2अग्निवीर (टेक्निकल) 3सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
4अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल5अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)6अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

हे पण पहा👇👇👇



शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा. 

पद क्र.3: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).

पद क्र.4: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).

पद क्र.5: 10वी उत्तीर्ण.

पद क्र.6: 08वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी 17.5 ते 23 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

सूचना: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

दहावी निकाल 2022 वेबसाईट लिंक – SSC Result 2022 Website Link



Maharashtra Board 10th SSC Result 2022 : महाराष्ट्र बोर्डने इयत्ता 12 वीचा निकाल नुकताच जाहीर केलेला आहे. आता 10th SSC चे विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या या दोन परीक्षा असतात. विद्यार्थी वर्षभर या परीक्षांसाठी खूप अभ्यास करत असतात. जीवनातील महत्वाच्या परीक्षांमध्ये हि SSC Board Exam असते.
आजच्या या पोस्टमध्ये आपण Maharashtra 10th / SSC Result 2022 थोडी माहिती घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण Maharashtra 10th, SSC Result 2022 in Marathi, Maharashtra SSC Result 2022 Download Link, Maharashtra SSC Result Date 2022, SSC Exam 2022 Details आणि SSC चा निकाल २०२२ कसा चेक करायचा हे पाहणार आहोत.

दहावी निकाल 2022 | Maharashtra 10th/SSC Result 2022 Date and Time | SSC चा निकाल 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ने 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 या शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठीच्या SSC बोर्डाच्या परीक्षा विविध केंद्रांवर यशस्वीपणे पार पाडल्या. महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने विद्यार्थी बसले आहेत आणि आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. SSC Result 2022 साठी आता जास्त वाट पाहायची गरज नाही. SSC Result 2022 आज म्हणजेच 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे.

महाराष्ट्र एसएससी बोर्ड निकाल 2022 पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. कारण या वेबसाईट वरती निकाल जाहीर केला जाणार आहे, त्या वेबसाईट वरती तुम्ही निकाल चेक करू शकता. निकाल तपासण्याचे नावानुसार, एसएमएसद्वारे, शाळानिहाय आणि रोल नंबरनुसार असे अनेक मार्ग आहेत. तुमचे स्कोअरकार्ड आणि विषयानुसार गुण पाहण्यासाठी तुम्ही कोणतीही पद्धत निवडू शकता. दहावीचा निकाल कसा चेक करायचा हे सुद्धा आम्ही या पोस्ट मध्ये सांगणार आहोत. त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

दहावी निकाल 2022 – SSC Result 2022 Details

बोर्डाचे नाव –महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
परीक्षेचे नाव –SSC Exam / 10th
परीक्षेची तारीख –15 मार्च ते 4 एप्रिल 2022
निकालाची तारीख –17 जून 2022
निकालाचा वेळ –दुपारी १ वाजता
निकाल मोड –ऑनलाईन
वेबसाईट –mahresult.nic.in 

दहावी निकाल 2022 तारीख आणि वेळ – SSC Result 2022 Date and Time

2022 च्या महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे आणि हे सर्व विद्यार्थी बऱ्याच काळापासून निकालाची वाट पाहता आहेत. न्यूजमध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र बोर्डाचा अधिकृत विभाग 10 वी (SSC) चा निकाल 17 जून 2022 रोजी जाहीर करेल आणि निकालाच टाईम ची चर्चा केली तर तो दरवर्षी प्रमाणे दुपारी १ लाच जाहीर केला जाईल.

महाराष्ट्र बोर्ड 10वीच्या निकालाची तारीख आणि वेळ वरील वरती टेबलमध्ये दिलेल्या त्यांच्या अधिकृत वेबसाइट पोर्टलवर अपलोड केलेली आहे. नाव, रोल नंबर आणि जन्मतारीख यासारख्या लॉगिन क्रेडेंशियल्सच्या मदतीने विद्यार्थी एसएससी निकाल डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या निकालाबाबत अधिक अपडेट्ससाठी आमच्या ब्लॉग ला भेट देत राहा.

दहावी निकाल 2022 वेबसाईट लिंक – SSC Result 2022 Website Link

तुम्हाला 10 वी बोर्ड निकाल 2022 महाराष्ट्र बोर्ड डाउनलोड संबंधित चे सर्व नवीनतम अपडेट mahresult.nic.in या वेबसाईट वरती मिळतील. बोर्ड आता या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करत असून हे अपडेट व्हायला थोडा वेळ लागेल असे सांगितले जात होते परंतु आता जास्त वाट पाहण्याची गरज नाही 17 जून 2022 ला निकाल जाहीर केला जाणार आहे. निकाल अपडेट केवळ अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केले जातील.

खालील वेबसाईट वरती 10th Result 2022 जाहीर केला जाणार आहे –

दहावी (SSC) चा निकाल कसा बघायचा – How to Check SSC Result 2022

महाराष्ट्र बोर्ड SSC निकाल 2022 नावानुसार अधिकृत घोषणेनंतर अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध होईल. कारण अधिकृत लिंक व्यतिरिक्त निकाल मिळवण्यासाठी आमच्याकडे दुसरी लिंक अजूनही समोर आलेली नाही. त्यामुळे तुम्ही अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी आणि झटपट निकाल अपडेट्ससाठी कनेक्ट राहावे.

दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  1. सर्वात आधी https://mahresult.nic.in/ या वेबसाईट ला भेट द्या.
  2. आता Maharashtra SSC Board 2022 Results या पर्यायावरती क्लिक करा.
  3. आता आपला Roll Number, Date of Birth आणि आईचे नाव योग्य ठिकाणी प्रविस्ट करा.
  4. सर्व योग्य केल्यावर Submit बटन वर क्लिक करा.
  5. आता आपला निकाल ओपन होईल. तो चेक करा आणि PDF च्या स्वरूपात डाउनलोड करून ठेवा.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PMSYM ) प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची लाभ कोणते?आणि आपण रजिस्ट्रेशन का करायचं सविस्तर वाचा



नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 2022 या योजने संदर्भात माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण काय आहे श्रमयोगी मानधन योजना, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, PMSYM योजना लाभार्थी पात्रता काय, कोण लाभ घेऊ शकत नाही, PMSYMआवश्यक कागदपत्रे कोणती, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना साठी अर्ज कुठे व कसा करायचा, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना हेल्पलाईन क्रमांक काय आहे तसेच या योजनेच्या अटी कोणत्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या लेखात मिळणार आहे. जर तुम्ही असंघटीत क्षेत्रातील कामगार असाल, तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. या योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

PM Shram Yogi Mandhan Yojana 2022

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर केली होती. आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना १५ फेब्रुवारी २०१९ पासून लागू करण्यात आलेली आहे. हि योजना वीट भट्टी कामगार, घरगुती नोकर, रिक्षाचालक, मजूर, शिंपी, मोची इत्यादी असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सुरू केलेली आहे. मासिक उत्पन्न १५,०००/- रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणारे असंघटित क्षेत्रातील कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेअंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर लाभार्थ्यांना प्रतिमहा पेन्शन देण्यात येणार आहे. ही पेन्शन दरमहा ३,०००/- रुपये दिली जाईल. आत्तापर्यंत ४४.९० लाखांहून अधिक कामगारांनी नोंदणी केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला दरमहा गुंतवणूक करावी लागणार आहे. गुंतवणूकीची रक्कम ही वयाच्या आधारावर निश्चित केली जाईल. ही रक्कम ५५/- रुपयांपासून २००/- रुपयांपर्यंत असेल. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत अंदाजे १० कोटी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची उद्दिष्ट काय?

PMSYM योजनेचे मुख्य उद्दिष्ट असंघटीत क्षेत्रातील कामगारांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन देऊन या योजनेद्वारे त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे आहे. तसेच वृद्धापकाळात त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेअंतर्गत त्यांना स्वावलंबी व सशक्त बनवणे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या वृद्धापकाळातील आयुष्य जगण्यासाठी कोणत्याही प्रकारचा सहारा नसतो. म्हणून केंद्र सरकार अशा योजना अंतर्गत सर्व गरीब आणि मजुरांना या योजने अंतर्गत प्रतिमहा ३,०००/- रुपयापर्यंत ची पेन्शन देऊन आर्थिक मदत करत आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत निश्चित उत्पन्नाचे स्रोत नसणाऱ्या अशा कामगारांना दिलासा मिळणार आहे.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची लाभ कोणते?

  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर प्रतिमहा ३,०००/- रुपये इतकी पेन्शन दिली जाईल.
  • लाभार्थ्यांची पेन्शन रक्कम ही त्याच्या प्रीमियम रकमेवर अवलंबून असेल. त्याने जेवढी योगदान रक्कम भरलेली आहे, त्या रकमेनुसार सरकार तुमच्या खात्यात पैसे जमा करेल.
  • जर लाभार्थी या योजनेअंतर्गत पेन्शन घेताना मरण पावला, तर त्याच्या पेन्शनच्या रकमेच्या ५० टक्के रक्कम त्याच्या जोडीदाराला पेन्शन म्हणून दिली जाईल. म्हणजेच लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला १,५००/- रुपये प्रतिमहा पेन्शन मिळेल.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत लाभ कोण घेऊ शकत नाही?

  • जे नागरिक आयकर भरतात असे नागरिक
  • राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सदस्य
  • संघटित क्षेत्रातील व्यक्ती
  • राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे सदस्य
  • कर्मचारी भविष्य निधी सदस्य

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो?

  • भूमिहीन शेतमजूर
  • लहान आणि सीमांत शेतकरी
  • पशुपालक आणि दगडाच्या खाणी मध्ये लेबलिंग आणि पॅकिंग करणारे
  • कोळी
  • पशुपालक
  • बांधकाम आणि पायाभूत सुविधा कामगार
  • स्थलांतरित मजूर
  • विणकर
  • सफाई कामगार
  • भाजी आणि फळविक्रेता
  • घरगुती कामगार

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची आवश्यक पात्रता काय?

  • अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांत दरम्यान असावे.
  • योजनेसाठी बँक खाते असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार असंघटित क्षेत्रातील कामगार असावा.
  • अर्जदार व्यक्तीचे मासिक उत्पन्न १५,०००/- रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराकडे आधार क्रमांक आणि मोबाईल फोन असणे आवश्यक आहे.
  • पीएम श्रमयोगी मानधन योजना अर्जदार आयकर भरणारा नसावा.
  • सरकारी कर्मचारी कर्मचारी भविष्य निधी (EPF) राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ESIC) चे सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 2022 वैशिष्ट्ये

  • अर्जदार लाभार्थी द्वारे एलआयसी कार्यालयात मासिक प्रीमियम देखील जमा केला जाईल.
  • योजना पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला मासिक पेन्शन दिली जाईल.
  • ही मिळणारी मासिक पेन्शन थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाईल.
  • या योजनेसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही लाईफ कार्पोरेशन ऑफ इंडिया कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PMSYM ) साठी अर्ज आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना  (रजिस्ट्रेशन) साठी अर्ज कसा करावा?

  • इच्छुक अर्जदाराला सर्वप्रथम प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्व कागदपत्रांसह जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रांमध्ये जावे लागेल.
  • यानंतर अर्जदाराला आपली सर्व कागदपत्रे सीएससी अधिकाऱ्याला द्यावी लागतील.
  • यानंतर सीएससी अधिकारी एजंट तुमचा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चा ऑनलाईन फॉर्म भरेल.
  • अर्ज भरून झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट तुम्हाला देईल.
  • या अर्जाची प्रिंट आउट तुम्ही तुमच्याकडे भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.
  • अशाप्रकारे तुमचा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची साठीचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होईल.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना official website


PMSYM 2022 अटी कोणत्या?

  • जर लाभार्थी दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीनंतर पण साठ वर्षाच्या व यापूर्वी या योजनेतून बाहेर पडत असेल, तर लाभार्थ्याला जमा झालेल्या व्याजासह अंशदान किंवा बचत बँक दर यापैकी जे जास्त असेल ते योगदान दिले जाईल.
  • जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाला असेल, तर त्याचा जीवन साथीदार योजना चालू ठेवू शकतो.
  • जर लाभार्थी १० वर्षांपूर्वी योजनेतून बाहेर पडला, तर योगदान बचत खात्याच्या दराने त्याला दिले जाईल.
  • जर एखादी व्यक्ती वयाच्या साठ वर्षांपूर्वी कायमस्वरूपी आश्रित बनली आणि ही योजना सुरू ठेवण्यासाठी असमर्थ असेल, तर त्याचा जोडीदार ही योजना पुढे सुरू ठेवू शकतो. या व्यतिरिक्त NSSB च्या सल्ल्यानुसार सरकार इतर निर्गमन देखील करू शकते.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना का हेल्पलाइन नंबर –

  • ई-मेल आईडी – vyapari@gov.in | shramyogi@nic.in
  • हेल्पलाईन नंबर -1800 267 6888

घरगुती गॅस वापरकर्त्यांना प्रति सिलिंडर 200 सबसिडी , वर्षाला 12 सिलेंवर योजना लागू , 9 कोटी जनतेला फायदा

 पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपये प्रति गॅस सिलिंडर प्रमाणे वर्षाला 12 सिलिंडरला सबसिडी मिळणार आहे अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे . आम्ही पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या 9 कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना 200 रुपये प्रति गॅस सिलिंडर ( 12 सिलिंडर ) सबसिडी दिली जाणार . यामुळे आमच्या माता - भगिनींना मदत मिळेल , असं असे त्यांनी जाहीर केली आहे .

पीएम किसान निधीची प्रतीक्षा संपली, या तारखेला 2000 रुपये येतील, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले, ई-केवायसी आवश्यक आहे


पीएम किसान निधीची प्रतीक्षा संपली, या तारखेला 2000 रुपये येतील, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले पीएम किसान निधी: केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एका कार्यक्रमादरम्यान पीएम किसान निधीच्या 11 व्या हप्त्याच्या तारखेशी संबंधित एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सर्व प्रकारच्या योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. PM Kisan Nidhi: PM किसान सन्मान निधीच्या 11 व्या हप्त्यासाठी देशभरातील 12.50 कोटी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले आहे की पीएम मोदी यांच्या हस्ते 11 वा हप्ता कधी जारी होणार आहे? वास्तविक, पीएम किसानचे पैसे १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान येणार आहेत. ज्याची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. एका कार्यक्रमात जाहीर केले कृषी मंत्री नरेंद्र सिंह (नरेंद्र सिंह तोमर) यांनी 11वा हप्ता हस्तांतरित करण्याच्या तारखेबद्दल सांगितले आहे. मध्य प्रदेशमध्ये आयोजित कृषी कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्र्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमात त्यांचा अक्षरश: सहभाग होता. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी 'किसान सन्मान निधी कार्यक्रम' जाहीर केला होता. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 समान हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. 31 मे रोजी पैसे येतील किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता पंतप्रधान 31 मे रोजी पुन्हा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 2021 मध्ये 15 मे रोजी सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. 15 मे जवळ असताना लाभार्थी शेतकरी 11 व्या हप्त्याची वाट पाहत होते. केंद्रीय मंत्र्यांनी तारीख जाहीर केल्यानंतर प्रतीक्षा आणखी वाढणार आहे.

 ई-केवायसी आवश्यक आहे आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी 11व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. साडे बारा कोटींपैकी जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने ई-केवायसी करू शकता. याशिवाय, तुम्ही घरी बसून पीएम किसानच्या वेबसाइटला भेट देऊन ई-केवायसी पूर्ण करू शकता.

Aadhaar Card :आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. आधारला मोबाईल नंबर लिंक करण्याचा त्रास संपला, टेन्शन घेऊ नका, फक्त हे करा

    सध्या आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक झालंय. कुठेही गेलं की तुमचं आधार कार्ड द्या म्हणतात. बँक (Bank), शासकीय कार्यालयं असो वा कुठेही. त्यातही तुमच्या नावात थोडाही बदल असला की ते बदलण्याची डोकेदुखी असतेच. आधार कार्डला अनेकदा पॅन (PAN) कार्ड लिंक नसल्यासंही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी पुन्हा वेगळी माहिती देऊन ते अपडेट करावं लागतं. या सगळ्यात मोबाईल नंबर (mobile number) आधार कार्डसोबत लिंक असण्याची प्राथमिकता असते. कारण, आधार कार्डशी संबंधित कोणताही व्यवहार असला की आपल्याला ओटीपी येतो. त्यासाठी आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असतं. त्याआधी आधार कार्ड कसं मिळवता येईल? यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. हे फॉलो केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड सहज मिळेल.

    नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाशिवाय आधार कसा मिळवायचा-

    लक्षात ठेवा की नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाशिवाय तुम्ही आधार ऑनलाइन मिळवू शकत नाही. खाली दिलेल्या पायऱ्यांचं नुसरण करून तुम्ही मोबाईल नंबरशिवाय आधार मिळवू शकता.

    1. तुमच्या आधार क्रमांकासह जवळच्या आधार केंद्राला भेट द्या
    2. आता आवश्यक बायो-मेट्रिक तपशील पडताळणी करा जसे की थंब व्हेरिफिकेशन आणि रेटिना स्कॅन इ.
    3. तुमच्यासोबत पॅन आणि ओळखपत्र सारखे इतर ओळखीचे पुरावे सोबत ठेवा
    4. प्रक्रियेनंतर, केंद्रातील संबंधित व्यक्तीकडून तुम्हाला तुमच्या आधारची प्रिंट आऊट दिली जाईल. सामान्य कागदाच्या स्वरूपात तयार केलेल्या आधारसाठी 50 रुपये आणि पीव्हीसी आवृत्तीसाठी 100 रुपये द्यावे लागतील.

    आधार कार्डसाठी नावनोंदणी

    आधार केंद्र किंवा बँक/पोस्ट ऑफिसला भेट देऊन कोणतीही व्यक्ती आधार कार्डसाठी नावनोंदणी करू शकते. यानंतर तो UIDAI द्वारे जारी केलेल्या एनरोलमेंट आयडी, व्हर्च्युअल आयडीद्वारे त्याचे आधार कार्ड प्रिंट करू शकतो. आधार क्रमांक दिल्यावर तुम्‍ही त्याचे आधार कार्ड वेगवेगळ्या प्रकारे डाउनलोड किंवा प्रिंट करू शकतात. या आधार कार्डचा वापर कोणत्याही सरकारी योजनेसाठी करता येतो.

    आधार कार्ड का गरजेचं?

    आधार कार्ड आवश्यक झालंय. कुठेही गेलं की तुमचं आधार कार्ड द्या म्हणतात. बँक, शासकीय कार्यालयं असो वा कुठेही. त्यातही तुमच्या नावात थोडाही बदल असला की ते बदलण्याची डोकेदुखी असतेच. आधार कार्डला अनेकदा पॅन कार्ड लिंक नसल्यासंही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी पुन्हा वेगळी माहिती देऊन ते अपडेट करावं लागतं. या सगळ्यात मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक असण्याची प्राथमिकता असते. म्हणून वरील दिलेल्या पायऱ्या वापरा आणि भविष्यातील अडचणी दूर करा.


Post Office Investment | गुंतवणुकीसाठी 5 वर्षाची मुदत ठेव योजना चांगली की NSC ? | फायदा कुठे जाणून घ्या Post Office Investment |

Post Office Investment |  5 year term deposit plan for investment or NSC?  |  Find out where the benefits are Post Office Investment


पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर अशा अनेक योजना आहेत , ज्यात तुम्ही पैसे गुंतवू शकता . पण जर तुम्हाला 5 वर्षांच्या स्कीममध्ये एकरकमी गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट किंवा नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट स्कीम ( पोस्ट ऑफिस एनएससी ) चा पर्यायही निवडू शकतं . आता या दोन्ही योजनांपैकी कोणती योजना अधिक चांगली आहे , हे आपण येथे समजू If you want to make a lump sum investment in the 5 - year scheme , then the post office can also opt for the National Saving Time Deposit or the National Savings Certificate Scheme : खाते उघडण्यासाठी किती पैसे लागतात : पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉजिट आणि नॅशनल सेव्हिंग स्कीम हे दोन्ही अकाउंट १००० रुपयांना उघडले जातात आणि १०० रुपयांच्या पटीत तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता . पोस्ट ऑफिसच्या दोन्ही योजनांमध्ये सिंगल ते तीन लोक मिळून जॉइंट अकाउंटही उघडू शकतात . नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉजिट अकाउंट अल्पवयीन मुलाच्या नावे गार्डियन खाते उघडू शकते . १० वर्षांवरील अल्पवयीन मुलाच्या नावावरही खाते चालू शकते . कोणत्या योजनेत किती व्याज मिळते : अधिकृत वेबसाइटनुसार , पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट स्कीमसाठी ५ वर्षांसाठीचा व्याजदर सध्या वार्षिक ६.७ टक्के आहे , तर पाच वर्षांच्या पोस्ट ऑफिस योजनेत वार्षिक ६.८ टक्के चक्रवाढ व्याजदर लागू असला तरी तो मॅच्युरिटीवर दिला जातो . करसवलतीचे फायदे : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील गुंतवणुकीवर तुम्ही आयकर सूटही घेऊ शकता . तसेच 5 वर्षांच्या मुदत ठेवीत गुंतवणुकी अंतर्गत आयकर कायदा 1961 च्या कलम 80 सी चा लाभ घेता येईल . पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉजिट स्कीममध्ये तुम्हाला हवी तेवढी खाती उघडता येतात 

PM Kisan Yojana शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत 6 हजार रुपये वाट कसली बघताय आताच करा मग हे काम

 PM Kisan Yojana | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने ( PM Kisan Yojana ) अंतर्गत मोदी सरकार देशातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपयांचा हप्ता टाकते . आतापर्यंत या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 10 हप्ते वर्ग करण्यात आले आहेत. परंतु जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही ई केवायसी पूर्ण केले नसेल , तर यावेळी तुम्हाला 11 वा हप्ता मिळणार नाही . ई - केवायसी म्हणजेच बँक खात्यासह , तुम्हाला तुमची आवश्यक कागदपत्रे देखील सबमिट करावी लागतील आणि तुमच्याबद्दल संपूर्ण माहिती द्यावी लागेल . ( PM Kisan Yojana )
असे पूर्ण करा eKYC जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन तुमचे केवायसी पूर्ण करू शकता . परंतु हे काम घरबसल्या करायचे असेल तर ही सुविधाही उपलब्ध आहे . तुम्हाला तुमचे ई - केवायसी 22 मे 2022 पर्यंत पूर्ण करावे लागेल . - यासाठी सर्वप्रथम PM किसान योजनेचे अधिकृत पोर्टल पीएम किसान सन्मान निधीच्या रूपात दरवर्षी 6,000 रुपये मिळतात , ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जारी केली जाते , जी दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते . Web PM KISAN ला भेट द्या आणि होमपेजवरील Farmers Corner वर क्लिक करा .
- यानंतर , ई - केवायसी पर्याय निवडून एक नवीन पेज ओपन होईल . आधार कार्डची माहिती दिल्यानंतर आता सर्च टॅबवर क्लिक करा . यानंतर , नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी सबमिट करा , तुमचे ई - केवायसी आता पूर्ण झाले आहे आणि आता 6,000 रुपयांचा 11 वा हप्ता देखील तुमच्या खात्यात येईल .
पीएम किसान सन्मान निधीच्या रूपात दरवर्षी 6,000 रुपये मिळतात , ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जारी केली जाते , जी दर चार महिन्यांच्या
अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते . 

PM Kisan Yojana |  Under the Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana (PM Kisan Yojana), the Modi government pays an annual installment of Rs 6,000 into the accounts of all farmers in the country.  So far, 10 installments have been disbursed to farmers' bank accounts under this scheme.  But if you are a farmer and you have not completed e KYC, you will not get 11th installment this time.  Along with e-KYC i.e. bank account, you will also need to submit your required documents and provide complete information about yourself.  (PM Kisan Yojana)

 How to complete eKYC You can complete your KYC by visiting the nearest Common Service Center.  But this facility is also available if you want to do this work from home.  You have to complete your e-KYC by 22nd May 2022.  - For this first of all PM Kisan Yojana's official portal PM Kisan Sanman Nidhi gets Rs. 6,000 per annum, this amount is released in three installments of Rs.  Visit the Web and click on Farmers Corner on the homepage.

 - After this, a new page will open by selecting e-KYC option.  Now click on Search tab after providing Aadhar Card information.  After that, submit the OTP received on the registered mobile number, your e-KYC is now complete and now the 11th installment of Rs. 6,000 will also be credited to your account.

 The PM receives Rs. 6,000 per annum in the form of Kisan Sanman Nidhi, which is released in three installments of Rs.

pm kisan list तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार रुपये


पंतप्रधान मोदी सातत्याने डिजिटल इंडियावर जोर देत असतात. याचाच एक भाग म्हणून PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, बँक खात्यात किती पैसे आले व कधी आले? याबाबतची माहिती मिळण्यास अडचण येते. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारद्वारे pm kisan list अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने शेतकरी घरबसल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, याची माहिती घेऊ शकतील. हे अ‍ॅप कसे डाउनलोड करू शकता व याचे फायदे काय, ते जाणून घेऊया.
                      येथे क्लिक करा

सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या या अ‍ॅपला तुम्ही अँड्राइड pm kisan list प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजीसह जवळपास ८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी या अ‍ॅपवर आधार कार्ड, बँक खाते नंबर आणि मोबाइल नंबरच्या मदतीने किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व माहिती घेऊ शकतात. याशिवाय, बँक खात्यात कधी व किती पैसे जमा झाले याची देखील माहिती मिळेल. हे एक सरकारी अ‍ॅप आहे, त्यामुळे प्रायव्हसीबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, अ‍ॅपला तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.

राशनकार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे.लाखो अपात्र लोक लाभ घेत असल्याचं सरकारच्या गेल्या काही दिवसांत नजरेत आलं. सविस्तर माहिती पहा


राशनकार्ड धारकांसाठी (Ration Card Holder) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सरकारने कोरोनाच्या काळात गरिबांसाठी मोफत रेशनची व्यवस्था सुरू केली होती. मात्र,  मिळणाऱ्या मोफत रेशनचाही लाखो अपात्र लोक लाभ घेत असल्याचं सरकारच्या गेल्या काही दिवसांत नजरेत आलं. (your ration card will be canceled in these 4 situations know what are the latest rules) 

कारवाही शक्यता

त्यामुळे जनतेने पुढाकार घेऊन स्वतःची शिधापत्रिका रद्द करून घ्यावी, असं आवाहन सरकारतर्फे जनतेला करण्यात आलंय. शिधापत्रिका रद्द न केल्यास पडताळणीनंतर अन्न विभागाचे पथक ते रद्द करेल. तसेच योजनेचा गैरफायदा घेतलेल्या राशनकार्ड धारकांवर कारवाई होऊ शकते.

नियम काय आहेत?

जर एखाद्या कार्ड धारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर असेल, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, गावात 2 लाखांपेक्षा जास्त आणि शहरात वार्षिक 3 लाखांचे कौटुंबिक उत्पन्न असेल, तर अशा लोकांनी स्वतःचे  रेशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल.

....तर वसूली होणार

शासनाच्या नियमानुसार शिधापत्रिका धारकाने कार्ड सरेंडर न केल्यास, पथक छाननी करेल. त्यानंतर छाननीत अशा लोकांचं रद्द केलं जाईल. यासोबतच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर अशा लोकांकडून तो रेशन घेत असल्याने रेशनही वसूल केलं जाईल. 

pm kisan list तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार रुपये नसेल आले तर आता करा हे काम

पंतप्रधान मोदी सातत्याने डिजिटल इंडियावर जोर देत असतात. याचाच एक भाग म्हणून PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, बँक खात्यात किती पैसे आले व कधी आले? याबाबतची माहिती मिळण्यास अडचण येते. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारद्वारे pm kisan list अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने शेतकरी घरबसल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, याची माहिती घेऊ शकतील. हे अ‍ॅप कसे डाउनलोड करू शकता व याचे फायदे काय, ते जाणून घेऊया.
हे पण पहा
pm kisan list तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार रुपये नसेल आले तर आता करा हे काम


सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या या अ‍ॅपला तुम्ही अँड्राइड pm kisan list प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजीसह जवळपास ८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी या अ‍ॅपवर आधार कार्ड, बँक खाते नंबर आणि मोबाइल नंबरच्या मदतीने किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व माहिती घेऊ शकतात. याशिवाय, बँक खात्यात कधी व किती पैसे जमा झाले याची देखील माहिती मिळेल. हे एक सरकारी अ‍ॅप आहे, त्यामुळे प्रायव्हसीबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, अ‍ॅपला तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.

शेतकरी बांधवांनो आपण Pm Kisan Kyc केली असेल . परंतु आपली केवायसी झाली आहे का ? ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे आहे .

Pm Kisan Beneficiary Status 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत . शेतकरी बांधवांनो आपण Pm Kisan Kyc केली असेल . परंतु आपली केवायसी झाली आहे का ? ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे आहे .लाल किंवा आपल्या लाभार्थ्यांची स्टेटस आपला काय दाखवत आहे . हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे . आणि त्यामध्ये आपल्याला कळणार आहे की आपल्याला 11 वा हफ्ता मिळू शकतो की नाही . तर यामध्ये आपली केवयासी झाली आहे की नाही ऑनलाईन चेक कसे करायचे . त्याचबरोबर पात्र यादी ही कशी पहायची आपलं स्वतःचं लाभार्थी स्थिति कशी ऑनलाईन चेक करायची . संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा यामध्ये दिली संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता .



Pm Kisan Beneficiary Status 
● तुमच्या डिव्हाइसचा वेब ब्राउझर उघडा वेबसाइटला भेट द्या • Pmkisan.gov.in नंतर खाली स्क्रोल करा 
● Beneficiary List वर क्लिक करा 
• एक नवीन पृष्ठ Open होईल दिलेल्या पर्याय मधून एक पर्याय निवडा 
● म्हणजे आधार क्रमांक , खाते क्रमांक निवडलेले माहिती भरा प्रविष्ट करा व ते सत्यापित करा त्यानंतर " Get Data " वर क्लिक करा 
• PM किसान लाभार्थी यादी स्क्रीनवर पहा

pm kisan 11th installment date 
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 11 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी दिला जाऊ शकतो . तर शेतकऱ्यांना अकरा वा हफ्ता हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा मे दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा होऊ शकतो . अशी माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्या . जेणेकरून येणाऱ्या पुढील 2 हजार रुपयांचा लाभ आपल्याला दिला जाणार . पीएम किसान पात्र शेतकरी यादी आपण वैयक्तिक स्टेटस आपलं पाहू इच्छित असाल तर बेनिफिशियरी स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे . किंवा आपल्या गावाची संपूर्ण पात्र लाभार्थ्यांची यादी पाण्यासाठी बेनिफिशियरी लिस्ट यावर ती क्लिक करून पहा . अश्याप्रकारे सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकणार आहात . आणि आपण व्हिडिओच्या द्वारे यादी कशी पहायची ती माहिती किंवा तो व्हिडिओ पाह

Pm Kisan Aadhaar Bank Link Status
 महत्त्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे आता आपले स्टेटस म्हणजेच आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहेत का . किंवा आपलं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहेत का हे जाणून घेणे गरजेचे आहे . आपलं आपण केवायसी केली असेल तर त्या ठिकाणी दिसून आले असेल आधार verify हे दिसून येत आहे . त्यामुळे आता शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे . आणि त्याच बँकेत आता इथून पुढे पैसे येणार आहे . तरी चेक कसे करायचे या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहे . ( Pm Kisan Beneficiary Status 2022 ) ती आपण एकदा नक्की पहा .

सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ३६ हजार रुपये , जाणून घ्या अटी


Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना (Farmer) वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते, या योजनेचा लाभ देशभरातील शेतकरी घेत आहेत.

त्यामुळे जर तुम्हाला पीएम किसान (PM Kissan Yojna) सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, परंतु यासाठी काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

आता घरी बसलेल्या वृद्धांना सरकार दरमहा ३,००० रुपये पेन्शन (Pension) देणार आहे, ज्यासाठी तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक (Important) आहे. मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ त्या सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो, जे पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत.

त्याच वेळी, १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत आहेत, केंद्र सरकार (Central Government) पीएम किसानच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ देत आहे.

मानधन योजनेसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्याच वेळी, त्यात सामील होऊन, तुम्ही खिशातून खर्च न करता वार्षिक ३६,००० मिळवू शकता.


दरवर्षी इतके हजार रुपये कमवा

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याची योजना आहे. यामध्ये वयाच्या ६० नंतर प्रत्येक महिन्याला ३००० रुपये म्हणजेच वार्षिक ३६००० रुपये पेन्शन दिले जाते. जर एखादा शेतकरी पीएम-किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही.

पीएम-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देण्याचा पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्याला थेट खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. ६०००, त्याचा प्रीमियम देखील कापला जाईल. शेतकऱ्याला खिशातून खर्च न करता वार्षिक ३६००० आणि काही हप्ते देखील मिळतील.

किसान मानधन योजनेअंतर्गत १८-४० वर्षांपर्यंतचा कोणताही शेतकरी यामध्ये नोंदणी करू शकतो. मात्र, ज्यांच्याकडे जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन आहे तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

त्यांना किमान २० वर्षे आणि कमाल ४० वर्षे या योजनेंतर्गत ५५ ते २०० रुपये मासिक योगदान द्यावे लागेल. जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी सामील झालात तर मासिक योगदान दरमहा ५५ रुपये असेल. जर तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर दरमहा ११० रुपये द्यावे लागतील.

पीएम किसान सन्मान निधीमध्ये E-KYC सुविधा रद्द, शेतकऱ्यांना बसणार फटका; जाणून घ्या योजनेबद्दल नवीन अपडेट

 


Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी (farmer) आर्थिक मदत म्ह्णून वार्षिक ६ हजार रुपये देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) ही महत्त्वाची योजना राबवली आहे.

हे पण वाचा👇👇👇

Land Record 1880 जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर

या योजनेमध्ये वेळेनुसार नवनवीन बदल करण्यात आले असून याआधी या योजेनचा १० वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (bank Account) पाठवण्यात आला आहे. तसेच सरकार लवकरच २००० रुपयांचा ११ वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. सरकारने या सेवेत बदल केले आहेत. आता आधार OTP द्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे.

ई-केवायसी (E-KYC) करण्याच्या पद्धतीत बदल

किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर आधार ओटीपीद्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. आता तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी इतर पद्धती वापराव्या लागतील.

याचा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे

सरकारच्या या बदलाचा परिणाम अशा शेतकऱ्यांवर होणार आहे ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही कारण सरकारने ओटीपीद्वारे ई-केवायसी करण्याची सेवा निलंबित केली आहे.

तथापि, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, ते आता जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल. तरच ते शेतकरी ११ व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकतील.

दहाव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत

काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दहाव्या हप्त्याचे पैसे पोहोचलेच नाहीत. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नसल्याचे समोर आले. अलीकडेच, सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे.

सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत दोनदा वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना ३१ मे पर्यंत ई-केवायसी करावे लागेल, त्यानंतरच पुढील हप्ता त्यांच्या बँक खात्यात येईल.

Nath E- Maha Seva Kendra

पोस्ट्स ब्लॉग संग्रहण: 2022

Nath E maha seva Kendra . Blogger द्वारे प्रायोजित.

Social

Slider

Label

Comments

Fashion

3/Fashion/grid-small

Blog Archive

Food

3/Food/feat-list

Music

2/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small
ads banner

Made with Love by

Made with Love by
Quick Spot Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Default Thumbnail

Default Thumbnail

World Best Digital Marketing Statergey Here !

World Best Digital Marketing Statergey Here !
Piki Bloggers Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers.

Sports

3/Sports/col-left

Top Stories

megagrid/recent

What's New

block/recent

Most Recent

3/recent/post-list

Masterchef

About Me
Munere veritus fierent cu sed, congue altera mea te, ex clita eripuit evertitur duo. Legendos tractatos honestatis ad mel. Legendos tractatos honestatis ad mel. , click here →

Categories

No Thumbnail Image

No Thumbnail Image

Click Here

About Us

About Us
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's.

Mobile Logo Settings

Mobile Logo Settings
image

आपले गाव आपल्या योजना हक्काचे चॅनेल

आपले गाव आपल्या योजना हक्काचे चॅनेल
आम्ही या वेबसाईट वर सरकारी योजनांच्या वेळोवेळी नवीन अपडेट्स देतो. तसेच आम्ही आगामी येणाऱ्या शैक्षणिक अपडेट्स, आपले सरकार, आणि बरेच काही यावर सुद्धा वेळेवर आणि अचूक माहिती प्रदान करतो. अधिक माहितीसाठी तुम्ही आपले गाव आपल्या योजना युट्युब चॅनेल ला भेट देऊ शकता.

Categories

Footer Copyright

Design by - Blogger Templates | Distributed by Free Blogger Templates

Tags

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable
Home Ads

Sports

3/Sports/col-left

Technology

3/Technology/col-right

Iklan Atas Artikel

header ads
¯\_(ツ)_/¯
Something's wrong

We can't seem to find the page you are looking for, we'll fix that soon but for now you can return to the home page

Most Popular

सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ३६ हजार रुपये , जाणून घ्या अटी

Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना (Farmer) वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते, या योजनेचा लाभ देशभरातील शेतकरी घेत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पीएम किसान (PM Kissan Yojna) सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, परंतु यासाठी काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे. आता घरी बसलेल्या वृद्धांना सरकार दरमहा ३,००० रुपये पेन्शन (Pension) देणार आहे, ज्यासाठी तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक (Important) आहे. मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ त्या सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो, जे पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत. त्याच वेळी, १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत आहेत, केंद्र सरकार (Central Government) पीएम किसानच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ देत आहे. मानधन योजनेसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्याच वेळी, त्यात सामील होऊन, तुम्ही खिशातून खर्च न करता ...

'ई-श्रम' वर नोंदणी,करून मिळवा दरमहा ३ ते ५ हजारांची पेन्शन

देशातील सर्व कामगार आणि मजुरांसाठी ई श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे. कारण याद्वारे सरकार मजूर आणि कामगारांसाठी नवीन योजना बनवू शकते. याद्वारे नवीन धोरणे बनवली जाऊ शकतात आणि त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. केंद्र सरकारने सर्वसामान्य, हातावरील पोट असलेल्यांसह असंघटित कामगारांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांच्या लाभासाठी ई-श्रम लाभार्थींना नोंदणी करावी लागते काही योजनांचा लाभ बँकांच्या माध्यमातून दिला जातो. बँकेतील बचत अथवा जनधन खात्यातून योजनेचा हप्ता कपात केला जातो. आतापर्यंत देठाभरातीळ २५ कोटी ५८ लाख २२ हजार २४६ जणांनी विविध योजनांमध्ये नोंदणी करून केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या द्वारे नोंदणी करून श्रमकार्ड घेतले आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेचे उद्दिष्ट  वृध्दपकाळ आरामदायी जावा, उदरनिर्वाहासाठी ज्येष्ठांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पेंशन तथा निवृत्ती वेतन योजना सुरु केल्या आहेत. तर हातावरीळ पोट असलेल्या दोनवेळच्या जेवणासाठी ध...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीएम किसान योजनेच्या इ-केवायसीला मुदतवाढ मिळणार

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीएम किसान योजनेच्या इ-केवायसीला मुदतवाढ मिळणार नमस्कार शेतकरी मित्रांनो, nathe-mahasevakendra तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत अद्यापही केवायसी केलेली नसेल अशा सर्व शेतकऱ्यांना ही केवायसी करण्यासाठी शासनाकडून मुदतवाड देण्यात आली आहे nathe-mahasevakendra nathe-mahasevakendra nathe-mahasevakendra त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी एक वेळेस केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर इ केवायसी करून घ्यावी अशी सूचना संबंधित मंडळाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या मोबाईल वरती किंवा जवळील सीएससी केंद्रामध्ये जाऊन ई केवायसी ची प्रक्रिया कम्प्लीट करून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांनी एक वेळेस प्रक्रिया कम्प्लीट केले नसेल यांना पुढील हप्ता मिळणार नाही याची...

Breaking Ticker